गुहागर, ता. 26 : धर्म चाहे कोई भी हो, अच्छे इंसान बनो, क्योंकि हिसाब सिर्फ कर्म का होता है, धर्म का नहीं, कायद्या पेक्षा आधुनिक समाजात चांगला माणूस निर्माण करण्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गुहागर न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. कपाडिया यांनी केले. Workshop on Laws at KDB College
तालुका विधी सेवा समिती व गुहागर खरे ढेरे भोसले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक कार्यशाळा गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये पार पडली. या कार्यशाळेला ॲड. मनाली आरेकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. एम. आर. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद कांबळे, प्राध्यापिका सौ. रश्मी आडेकर, गुहागर न्यायालयातून राजेश चिपळूणकर, श्री.सरकुंडे, श्री. खेरटकर, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. Workshop on Laws at KDB College


न्यायाधीश श्री. पी.व्ही. कपाडिया पुढे म्हणाले, पोस्को कायद्याची गरज का निर्माण झाल्याचे सांगितले. या कायद्याचे वेगळेपण सांगताना खास न्यायालय, जलद न्याय, बालक केंद्रित प्रक्रिया, ओळख उघड न करणे, बर्डन ऑफ पृफ्, विक्टिमला संरक्षण, 30 दिवसांची मुदत इत्यादी वैशिष्ट्ये विशद केली. एक तिबेटियन म्हण न्यायाधीश कपाडिया यांनी A Child Without Education Is a Bird Without Wings…यातून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी शिक्षणाचा अधिकार ह्या कायद्याचा उद्देश स्पष्ट करताना वय वर्ष ६ ते १४ या वयोगटातील शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी संविधानात मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केल्या गेल्याची माहिती दिली. Workshop on Laws at KDB College
आजच्या चारही कायद्याचा केंद्रबिंदू बालक असून त्या संदर्भात आजच्या विद्यार्थ्यांना त्यांनी जास्तीत जास्त संवेदनशील होण्याचे व हे कायदे गंभीरतेने घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी हे चारही कायदे समजून घेऊन समाजात जागृती निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले. ॲड. मनाली आरेकर यांनी ‘मुलगी वाचवा व मुलगी शिकवा’ या विषयावर मार्गदर्शन केले. सध्या मुलींची शैक्षणिक स्थिती सुधारली असली तरी आजही समाजामध्ये भविष्यकाळाच्या भीतीतून मुलगा हवा ही सनातनी वृत्ती दिसून येते. यासाठी सरकारने काहीतरी कायदेशीर तरतूद केली पाहिजे. तरुणांच्या गंभीर होत चाललेल्या विवाहाच्या समस्या, निसर्गाच्या बिघडत चाललेला समतोल यावर “बेटी बचाव बेटी पढ़ाव” ही उपाय योजना योग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Workshop on Laws at KDB College


अठरा वर्षाच्या आतील व्यक्तीचा समावेश ‘ बालक ‘ संकल्पनेमध्ये होत असल्याचे सांगून त्यांनी बाल न्याय कायदा (मुलांची काळजी व संरक्षण ) 2015 हा कायदा स्पष्ट केला. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांचे आकर्षण, चंचल वय, मित्रांची संगत, व्यसनाधीनता यामुळे कळत नकळत मुलांच्या हातून गंभीर गुन्हे घडून जातात. तेव्हा एक चांगला नागरिक होण्यासाठी अशांना पुन्हा संधी देण्याची गरज हा कायदा पूर्ण करतो. त्यासाठी त्यातील तरतुदी व कार्यपद्धतीची ॲड. आरेकर यांनी माहिती दिली. या कार्यशाळेचे प्रास्तविक कार्यक्रमाधिकारी डॉ. आनंद कांबळे व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ. रश्मी आडेकर यांनी केले. Workshop on Laws at KDB College