• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चीनसमोर भारताच्या मुत्सद्देगिरीला यश

by Manoj Bavdhankar
September 17, 2024
in Bharat
151 2
0
298
SHARES
850
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गलवानसह चार ठिकाणांवरुन चीन सैन्याची माघार

नवीदिल्ली, ता. 17 : भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद कायम राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आल्याच्या घटना मागील काही वर्षांत घडल्या होत्या. त्यावेळी दोन्ही सैन्यात चकमकही झाली होती. परंतु आता भारत अन् चीन सीमा वाद सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. पूर्व लडाखमधील सैन्य चीनने मागे घेतले आहे. लडाखमधील गलवानसह चार ठिकाणांचे सैन्य मागे घेतल्याची कबुली चीनने दिली आहे. Success of India’s diplomacy against China

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चीनने सैन्य मागे घेतल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त माओ निंग यांनी सांगितले की, दोन्ही सैन्याने चार ठिकाणांवरुन माघार घेतली आहे. सीमेवर परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने चीन-भारत सीमेच्या पश्चिमेकडील सेक्टरमधील चार पॉइंट्सवरून मागे जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यामध्ये गलवान व्हॅलीचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनिव्हा येथे शुक्रवारी दिलेल्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही टिप्पणी आली आहे. Success of India’s diplomacy against China

जयशंकर म्हणाले होते की, चीनसोबतच्या सैन्य माघारी संबंधित समस्यांपैकी 75 टक्के समस्या सोडवण्यात आल्या आहेत. मात्र सीमेवरील वाढते लष्करीकरण हा मोठा मुद्दा आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि वांग यांच्यातील बैठकीचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चीन-भारत संबंधांमध्ये स्थिरता दोन्ही देशांच्या लोकांच्या दीर्घकालीन हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांत प्रादेशिक शांतता राहणार आहे. चीन आणि भारत सरकार परस्पर सांमजस्य राखणे, विश्वास वाढवणे, सतत संवाद राखणे आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणे यावर भर देणार आहे. भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील सैन्य संपूर्ण माघारी घेण्याचे ठरवले होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. Success of India’s diplomacy against China

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarSuccess of India's diplomacy against ChinaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.