भारतीय हवामान शास्त्र विभागाचा इशारा
मुंबई, ता. 05 : भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्वीस यांच्याद्वारे समुद्रात उधाण येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. रविवार ५ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Chance of high waves in the sea
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/05/Geete-Web-Advt-4-1024x181.png)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/05/Geete-Web-Advt-4-1024x181.png)
समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या ३६ तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे. उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची संख्या जास्त दिसून येते. त्यामुळे अतिरिक्त खबरदारी म्हणून सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Chance of high waves in the sea
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/05/Tatkare-Web-Advt-4-1024x227.png)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/05/Tatkare-Web-Advt-4-1024x227.png)