नारायण आगरे, सरपंच बोलावत नाहीत म्हणून राग आहे
गुहागर, ता. 02 : सरपंच म्हणून प्रशासकीय अधिकारी वेगवेगळ्या कामांच्या ठिकाणी मला बोलावतात. त्यावेळी मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती देऊ शकत नाही म्हणून माझ्यावर अविश्वास दाखवण्यात येत आहे, असे वरवेलीचे सरपंच नारायण आगरे यांनी सकाळची बोलताना सांगितले. सदस्यांनी दिलेली राजीनामे विहित नमुन्यात नसल्याचेही आग्रे यांनी यावेळी नमूद केले. Varveli Gram Panchayat Members Resignation
वरवेलीचे सरपंच नारायण आग्रे आणि ग्रामविकास अधिकारी विश्वासात घेत नसल्याने वरवेली ग्रामपंचायत मध्ये सर्व सदस्यांनी महाराष्ट्र दिनाचे ध्वजवंदन झाल्यावर राजीनामा दिला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली. यासंदर्भात बोलताना आगरे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षाच्या काळात मी मासिक सभा, मासिक मीटिंग आणि ग्रामसभा यामध्ये ज्या कामांना मंजुरी मिळाली तीच कामे करतो आहे. त्याची नोंद ग्रामपंचायतीमधील रजिस्टर मध्ये आहे. त्याच्यामुळे मी विश्वासात घेऊन काम करत नाही असा प्रश्नच येत नाही. Varveli Gram Panchayat Members Resignation


कळीचा मुद्दा वेगळाच आहे. सरपंच म्हणून अनेक वेळा शासकीय कार्यालयातून मला फोन येतात. वरवेलीतील सौर ऊर्जा प्रकल्प, जलजीवन मिशन किंवा अन्य कोणताही विषय असून शासकीय अधिकारी पाहणी दौऱ्याला येताना मला सोबत घेतात. या प्रत्येक वेळी माझ्या ग्रामपंचायत सदस्यांना मी निरोप द्यावा, त्यांना माझ्यासोबत घ्यावी, अशी त्यांची इच्छा असते. मात्र हे शक्य होत नाही. म्हणून असलेल्या नाराजीत जलजीवन चे काम ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे सुरू असल्याने पोटदुखी वाढली. जलजीवनची योजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावी. म्हणून पुढच्या ठेकेदार येईपर्यंत अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंटच्या माध्यमातून काम सुरू केले. यात माझी भूमिका काम योग्य पद्धतीने होते की नाही ते पाहणे इतकीच होती. तरी देखील नवा कॉन्ट्रॅक्टर पहिल्यांदा ग्रामपंचायतीत आला पाहिजे. असा सन्माननीय सदस्यांचा आग्रह राहिला. जो कॉन्ट्रॅक्टर अद्याप ठरलाच नाही तो ग्रामपंचायतीत कसा येणार, याचा विचार कोणी केला नाही. आणि गैरसमजातून हे नाराजी नाट्य घडले आहे. लवकरच माझे ग्रामपंचायतमधील सर्व सहकारी पुन्हा एक दिलाने एकत्र येतील, असा माझा विश्वास आहे. Varveli Gram Panchayat Members Resignation