गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे मत फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी व्यक्त केले. Uday Samant’s vision for development welcomed
ग्रीन स्टील, सी-प्लेन, शिपयार्ड आणि सीएनजी यांसारखे दूरदृष्टीचे प्रकल्प रत्नागिरीत आणून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विकासाचे नवे दालन खुले केले आहे. सुमारे ७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात आकर्षित करण्यात आली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग, पर्यटन आणि हरित ऊर्जेचा समन्वय साधणाऱ्या या प्रकल्पांमुळे रत्नागिरीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असून, ना. उदय सामंत यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जिल्ह्याला राज्याच्या औद्योगिक नकाशावर अधिक भक्कम स्थान मिळेल, असा विश्वास डॉ. पाटवर्धन यांनी व्यक्त केला. जिल्हा फेडरेशनच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे मनःपूर्वक स्वागत करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. Uday Samant’s vision for development welcomed