नवीन ठेकेदार नियुक्तीचे निमित्त, पाणीपुरवठा विभागाकडून काम सुरु
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामात काही व्यक्तींकडून विनाकारण खोडा घातला जात आहे. योजनेची पाईपलाईन टाकणे व नियुक्त केलेला नवा ठेकेदार समोर आणावा यासाठी अट्टाहास होत असल्याने पाणी योजनेच्या कामात व्यत्यय येत असल्याचे समोर आले आहे. Obstacle in the work of Varveli’s ‘Jaljeevan’ scheme
सध्या उन्हाळा अधिक तीव्र होत चालला आहे. काही गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कित्येक गावांच्या पाणी योजना रखडल्या आहेत. वरवेली येथील जलजीवन योजनेच्या कामाचा ठेका भिवाई कंन्ट्रक्शन यांनी घेतला होता. मात्र, त्यांनी वेळेत काम न केल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला. सदर मक्तेदाराला झालेल्या कामाचे ४८ लाख अदा करण्यात आले. शिल्लक करावयाच्या कामाचे ७८ लाखाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून नवीन मक्तेदार नेमणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, या योजनेचे पूर्वी काम घेणाऱ्या मक्तेदाराला समोर आणावे, असे ग्रामसभेत ठरविण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेला उशिर होण्याची शक्यता असल्याने सद्यस्थितीत पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून हे योजनेचे काम सुरु आहे. Obstacle in the work of Varveli’s ‘Jaljeevan’ scheme


योजनेचे काम सुरु असले तरी पाईपलाईन टाकण्यावरुन काहींनी हरकत घेतली आहे. पाईपलाईन रस्त्याच्या कडेने नेण्यात यावी, यासाठी आग्रह असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाणी योजनेच्या कामात अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पूर्वीच्या ठेकेदाराला समोर आणण्याविषयीचा मुद्दा उपस्थित होत असल्याने पाणी योजनेला कामाला उशिर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Obstacle in the work of Varveli’s ‘Jaljeevan’ scheme
पंप हाऊस बांधण्यासाठी पण ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वी पंपहाऊस बांधण्यासाठी जागा मिळाली आहे. त्यामुळे योजनेच्या कामातील अडथळे दूर होण्यास मदत झालेली असताना केवळ तेथील काहींना काम पूर्ण करण्यापेक्षा मक्तेदारमध्ये ज्यादा स्वारस्य असल्याची चर्चा आहे. Obstacle in the work of Varveli’s ‘Jaljeevan’ scheme
वाहिनी टाकण्यास अडथळा नाही
योजनेची पाईपलाईन टाकण्यास कोणाचीही हरकत नाही. तसेच नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीस उशिर होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडून योजनेचे काम सुरु झाले असून याला सर्व सदस्य, ग्रामस्थांनी सहकार्य करावे अशी आमची भूमिका आहे. यासंदर्भात मी पाणी समितीची बैठकही लावली आहे. – नारायण आग्रे, सरपंच