नवीदिल्ली, ता. 16 : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज लोकसभेचे वेळापत्रक जाहीर केले. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सात टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर संपुर्ण देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे. Lok Sabha Elections
लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलला पहिला तर २० मे रोजी शेवटचा टप्पा असेल. तसेच तसेच २६ विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. Lok Sabha Elections
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/adv-.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/adv-.jpg)
असे असेल पाच टप्प्यात मतदान
पहिल्या टप्प्यात (19 एप्रिल) : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर मतदान होईल.
दुसऱ्या टप्प्यात (26 एप्रिल) : बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीला मतदान होईल.
तिसऱ्या टप्प्यात (7 मे) : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेला मतदान होईल.
चौथा टप्पा (13 मे) : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड मतदान होईल.
पाचवा टप्पा (20 मे) : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ. Lok Sabha Elections