एकाही गावातून टँकरची मागणी नाही, प्रशासन यंत्रणा शांत
गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आहे. मात्र गुहागर तालुका हा टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. एप्रिलचा निम्मा महिना संपला तरी तालुक्यातील एकाही गावातून टँकरची मागणी आलेली नाही. त्यामुळे गुहागरमधील प्रशासन यंत्रणा शांत असल्याचे दिसून येत आहे. Guhagar taluka is moving towards tanker freedom
सध्या चिपळूण, खेड, मंडणगड, देवरूखसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पाणीटंचाई आहे. तेथील ग्रामपंचायतीने तहसील विभागकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. मात्र गुहागर तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने अजून तशी मागणी पंचायत समिती किंवा तहसील विभागाकडे केलेली नाही त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. तालुक्यातील मुंढर, खोडदे, पालीसह काही गावांमध्ये ग्रॅव्हीटीच्या पाणी योजना आहेत. या योजनांवर गावच्या पाण्याची तहान भागवली जाते. मुंडर येथील ग्रॅव्हिटीचे पाणी मार्च महिन्यामध्ये संपते. त्यानंतर नळ पाणी योजनेच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा केला जातो. Guhagar taluka is moving towards tanker freedom


गेल्या वर्षी गुहागर तालुक्यात पाणीटंचाई होती. साखरी त्रिशूल, धोपावे आणि सडे जांभारी या तीन गावांतून टँकरची मागणी झाली. त्यांना महसूल विभाग आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या धनगर वाड्यांमध्ये नेहमी पाणीटंचाई जाणवते. गुहागर तालुक्यातील डोंगराळ भागात धनगरवाड्या आहेत, मात्र तेथेही पाणी योजना पोचल्याने गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यावर्षी त्याही गावातून टँकरची मागणी आलेली नाही. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मागील पंधरा वर्षांत गुहागर तालुक्यातील टंचाई निवारणासाठी प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून तालुक्यात अजूनही टंचाई जाणवलेले नाही, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आहेत. उर्वरित योजनांचे काम सुरू आहेत. Guhagar taluka is moving towards tanker freedom
गुहागर तालुक्यात एकूण ११९ गावे आणि ६६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यातील टंचाई निवारणासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकूण ११२ नळ पाणी योजना राबवल्या जात आहेत. यातील २६ गावांच्या पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत त्यातून गावांना पाणीपुरवठा होत आहे. सहा पाणी योजनांचे काम अंतिम टप्प्यात आहे.


तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्रोत जिवंत आहेत. गावातील विहिरींना उन्हाळ्यातही पाणी असते. त्यामुळे पाणी योजनेचे पाणी बंद झाले तरी विहिरींच्या पाण्यावर गावातील ग्रामस्थ तहान भागवतात. अंजनवेल परिसरातील काही आरजीपीएल गावांना कंपनीकडून पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. Guhagar taluka is moving towards tanker freedom
तालुक्यातील एकाही गावात टँकरची मागणी नाही
गुहागरमधील नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी मी मागील पंधरा वर्षे संघर्ष केला आणि नियोजनपूर्वक कामही केले. त्यामुळे केवळ गुहागरच नव्हे तर माझ्या मतदारसंघात येणाऱ्या खेड तालुक्यातील गावांमध्येही अजून पाणीटंचाई जाणवलेली नाही. दोन दिवसांपूर्वी मी मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेतला. कोणत्याही गावातून टँकरची मागणी झालेली नाही. – भास्कर जाधव, आमदार गुहागर
सध्या तरी टँकर मागणी नाही
गुहागर तालुक्यात गेल्या वर्षी तीन गावांमध्ये पाणीटंचाई होती. यावर्षी अजून टँकरच्या मागणीचे पत्र आलेले नाही. सध्या तरी कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही. – परीक्षित पाटील, तहसीलदार गुहागर Guhagar taluka is moving towards tanker freedom