खलिस्तानी दाव्याचा मागोवा आणि सुरक्षा व्यवस्थेची यशोगाथा
गुहागर न्यूज : 13 जानेवारीपासून प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. याच मेळाव्यादरम्यान, १९ जानेवारी रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. विवेकानंद सेवा समिती, वाराणसीच्या तंबूमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या सजगतेमुळे आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच तिथे भीतीदायक वातावरणही तयार झाले नाही. एकंदरीत, महाकुंभातील उत्कृष्ट व्यवस्थेमुळे या दुर्घटनेचा परिणाम महाकुंभात आलेल्या भक्तांवर जाणवला नाही. Explosion in Mahakumbha
याच दरम्यान, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या खलिस्तानी संघटनेने प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या मेल नुसार, हि घटना पिलीभीत चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. Explosion in Mahakumbha
या घटनेमागे खरोखरच खलिस्तानी होते का, या प्रश्नाचे उत्तर मिळवणे प्रशासनाचे काम आहे. परंतु जेव्हा एखादी संघटना अशा प्रकारच्या घटना घडवून आणते, तेव्हा त्यांचा मुख्य उद्देश लोकांमध्ये भय निर्माण करणे हाच असतो. परंतु प्रयागराज येथे झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये कोणतेही भयाचे वातावरण निर्माण झाले नाही, तसेच कोणत्याही प्रकारची जीवितहानीही झाली नाही. तरीसुद्धा जर खलिस्तानी संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली असेल, तर याचा सरळ अर्थ असाच होतो की प्रयागराज मधील सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांचा डाव पूर्णतः फसला आहे. Explosion in Mahakumbha
महाकुंभात पाण्यापासून हवेपर्यंत हायटेक सुरक्षा
महाकुंभ-2025 च्या सुरक्षा आराखड्याने आतापर्यंत केलेल्या सुरक्षा व्यवस्थेला खूप मागे टाकले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने लाखो भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान आणि सुरक्षा यंत्रणामधील घट्ट समन्वयाने ताकदवान, संपूर्ण परिसरात ३७,००० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी एकूण पोलीस तैनातीमध्ये २२,९५३ अधिकारी जत्रेच्या मैदानावर नियुक्त करण्यात आले आहेत, ६,८८७ प्रयागराजमध्ये तैनात आहेत, ७,७७१ सरकारी रेल्वे पोलिस (GRP) आणि गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा ऑपरेशन्ससाठी अधिका-यांची अतिरिक्त तुकडी असेल. या कडक सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने विचाऱ् केला तर खसळीसतांनी संघटनेचा दावा निश्चितच संशयास्पद आहे. Explosion in Mahakumbha
40 कोटी लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण जत्रा हायटेक सुरक्षा उपकरणांनी सज्ज करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांचा, विशेषत: ड्रोन हल्ल्यांचा वाढता धोका लक्षात घेता प्रथमच इस्रायलच्या ड्रोनविरोधी यंत्रणेद्वारे महाकुंभावर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय अणु, रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि स्फोटक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी हायटेक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. Explosion in Mahakumbha
महाकुंभच्या सुरक्षा आराखड्यात केवळ ए, बी, सी योजनाच नाहीत, तर सुरक्षा यंत्रणांनी 10 ऑपरेशनल प्लॅनची रूपरेषाही तयार केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास या कार्यान्वित योजना अंमलात आणल्या जातील. त्याची तयारी करताना सुरक्षा संस्था, गुप्तचर संस्था, एनआयए, एटीएस, पोलिस आणि निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये विचारमंथन झाले. या ऑपरेशनल प्लॅन्ससाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकाही झाल्या आहेत. सर्व यंत्रणांच्या समन्वयासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. Explosion in Mahakumbha
सुरक्षेसाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि स्नायपर्सनी सज्ज कमांडो वॉच टॉवरवर तैनात केले जाणार असले, तरी मोठ्या स्नान उत्सवादरम्यान भारतीय लष्करही सुरक्षेसाठी तैनात असेल. लष्कराचे हेलिकॉप्टर आकाशावर नजर ठेवतील, अशी कडक सुव्यवस्था असताना, तिथे कुठल्याही प्रकारची दुर्घटना होते अशक्यच आहे.
आणि दुसरा मुद्दा जर खलिस्तानी संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली तर त्यांचे उद्दिष्ट वेगळेच आहे.
गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी संघटना विविध मार्गांनी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. परदेशातील भारतीय दूतावासासमोर निदर्शने करणे, भारतीय ध्वजाचा अपमान करणे, भारताविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण देणे, सोशल मीडियावरून प्रसिद्धीसाठी पोकळ धमक्या देणे, असे प्रकार ते सातत्याने करत आहेत. खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नून तर नियमितपणे भारताविरुद्ध विषारी प्रचार करून पोकळ धमक्या देतो. कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी या गुरपतवंत सिंग पन्नूनने सुद्धा एक धमकी दिली होती.
जेव्हा महाकुंभ मध्ये जेवण बनवताना तेलामध्ये दडलेल्या फोडणी मुळे झालेल्या तंबूला आग लागली त्याचाच फायदा घेऊन ‘खलिस्तानी संघटनांनी’ समाजात त्यांचे भय पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, अशा प्रकारच्या घटनांची जबाबदारी घेऊन ही संघटना आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि माध्यमांमध्ये चर्चा निर्माण करणे हा त्यांचा उद्देश असतो. या व्यतिरिक्त खलिस्तानी चळवळीला आता पूर्वीसारखा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे, अशा प्रकारच्या घटनांची जबाबदारी घेऊन ही संघटना आपल्या समर्थकांचे मनोधैर्य टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, याद्वारे स्वतःचे जागतिक स्थरावरती अशी ओळख बनवून, भारतविरोधी संस्थाकडून funds मिळवणे, हे सुद्धा या मागचे उद्धिष्ट असू शकते.
या घटनेमागे खरोखरच खलिस्तानी होते अथवा नाही, ही शोधण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा आणि आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असेल तर योग्य कारवाई करता येऊ शकते. परंतु त्यांच्या या फसलेल्या दाव्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली नाही, उलट त्यांची ही कृती हास्यास्पद ठरली आहे. एकंदरीत, ही घटना म्हणजे खलिस्तानी संघटनांचा प्रसिद्धीसाठीचा एक स्टंट होता. परंतु हा प्रयत्न पूर्णपणे फसला. Explosion in Mahakumbha