विश्व हिंदू परिषद केंद्रीय महामंत्री मा. बजरंगजी बागडा यांचे आंबेडकर स्मारकाला अभिवादन
रत्नागिरी, ता. 17 : शहरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ व्या जयंती निमित्त विश्व हिंदू परिषद केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागडा यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti


यावेळी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना विश्व हिंदू परिषद केंद्रीय महामंत्री बजरंगलाल बागडा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याविषयावर मार्गदर्शन करताना भारताच्या संविधान रचनेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जेवढे मोठे योगदान आहेच. भारतीय संविधानाच्या रचनेईतकेच भारत देशातील समाजाच्या रचनेमध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. राष्ट्रिय व सामाजिक रचनेमध्ये ते सार्थी होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti


भारतीय समाजाचे त्यांनी अध्ययन केले. वंचित व उपेक्षित वर्गाची भारतीय नवनिर्माणाची राष्ट्रीय एकतेसाठी नेतॄत्वाच्या माध्यमातून एक राष्ट्र रूपात सशक्त राष्ट्राच्या रुपात आपण बघत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मपरिवर्तन करण्यासाठी अनेक प्रस्ताव आले होते मात्र वंचीत व उपेक्षित वर्गाचे नेतॄत्व निर्विवाद रुपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti


मात्र भारताची अखंडता भारताची सामाजिक एकता भारतीय उद्भभूत पुजा उपासना पद्धती अनुसरुन कोणत्याही विदेशी धर्माबरोबर न जाता कोणत्याही विदेशी धर्माच्या आमिषाला बळी न पडता राष्ट्रीय रक्षणासाठी व राष्ट्रीय एकतेसाठी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमीका एक राष्ट्र नित्य समाज अशी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. यावेळी विश्व हिंदू परिषद विभागमंत्री विवेक वैद्य, सामाजिक समरसता प्रमुख संदेश टिळेकर मातॄशक्ती प्रमुख सौ.अस्मिता सरदेसाई, प्रसाद दामले, विशाल पटेल इत्यादी उपस्थित होते. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti