जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा; इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी
रत्नागिरी, ता. 24 : माजी खासदार स्वर्गीय गोविंदराव निकम जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा सह्याद्रि शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा सावर्डे ता. चिपळूण येथे घेण्यात येणार आहेत.
सोमवार दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता (१) मी शेतकरी होणार (२) राष्ट्रीय एकात्मता -काळाची गरज या विषयावर स्पर्धा घेण्यात येईल. प्रथम क्रमांकास – रोख रू ५०००/-, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास – रोख रू ३०००/-, चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास – रोख रू २०००/-, चषक व प्रमाणपत्र.
स्पर्धेचे सर्वसामान्य नियम व अटी – (१) सदर स्पर्धा केवळ मराठी भाषेतच होईल. (२) प्रत्येक स्पर्धकास आपले विचार मांडण्याकरिता ५+२ मिनिटांचा कालावधी असेल. (३) सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुख्याध्यापकांच्या सहीसह प्रवेशिका जमा करणे आवश्यक आहे. (४) स्पर्धकांनी प्रवास खर्च स्वतः करावयाचा आहे. (५) स्पर्धा वेळेवर सुरू होईल. (६) स्पर्धा सुरू असताना प्रत्येक स्पर्धकाने सभागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.(७) स्पर्धेसाठी एका शाळेतील केवळ दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
संपर्क :- (१) रसिका सुर्वे (८३६९७६२३९७) (२) प्रणित राजेशिर्के ( ८४११०६६८७२)
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा
सोमवार दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत (१) मोबाईल -शाप की वरदान (२) स्वच्छ गाव ,सुंदर गाव या विषयावर स्पर्धा घेण्यात येईल. प्रथम क्रमांकास – रोख रू ५०००/-, चषक व प्रमाणपत्र. द्वितीय क्रमांकास -रोख रू.३०००/ – , चषक व प्रमाणपत्र. तृतीय क्रमांकास – रोख रू २०००/-, चषक व प्रमाणपत्र.
सर्वसामान्य नियम व अटी :- (१) निबंध मराठी भाषेत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला असावा. (२) निबंध सुवाच्च अक्षरात लिहिलेला असावा. (३) निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका व खाडाखोड टाळावी. (४) लेखनासाठी निळ्या किंवा काळ्या रिफीलच्या बॉलपेनचा वापर करावा. (५) निबंध लेखनासाठी कागद आयोजकांकडून देण्यात येतील. (६) निबंध पाठपोट लिहू नये. (७) निबंधाचे लिखाण विषयानुरूप असावे. विषयबाह्य लिखाणाचा विचार करण्यात येणार नाही. (८) स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. (९) निबंध किमान २५० ते ३०० शब्दांचा असावा. (१०) प्रवेशिकांमधील निबंध प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजकांचा असेल. याबाबत भविष्यात स्पर्धकाला कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही.(११) निबंधांची तपासणी तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात येईल. (१२) स्पर्धेच्या नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार आयोजकांना राहील. (१३) स्पर्धेचा निकाल विजेत्यांना कळविण्यात येईल. (१४) बक्षीस वितरण समारंभासाठी विजेत्यांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. (१५) शाळेतील कितीही विद्यार्थी सहभागी होऊ शकतील.
संपर्क :- (१)प्रणिता दिंडे ९०४९११५७६५ , (२) अक्षता घाग ९६८९७९२९३०
बक्षीस वितरण समारंभ :- या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२५ रोजी स्वर्गीय गोविंदरावजी निकम यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमात स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांच्या स्मारकस्थळी सावर्डे ता. चिपळूण येथे होईल.