संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील आबलोली येथे रहदारीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या खडीमुळे अपघात होत आहेत. तरी सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या रस्त्यावरुन हि खडी ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी वाहन चालक आणि ग्रामस्थांनी आबलोली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खाते गुहागर याच्याकडे केली होती. याबाबत आबलोलीतील पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड आणि त्यांचे सहकारी होमगार्ड रेवाळे, मोहिते यांनी खडी रस्त्यातून हटवीण्यासाठी बांधकाम विभाग गुहागर व त्यांचे ठेकेदार यांना सांगून ती खडी रस्त्याच्या बाजूला ठेवल्याने वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित सुरु आहे. त्यामुळे वाहन चालक, पादचारी व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. Clearing traffic by removing gravel
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/adv-1-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/adv-1-1.jpg)
आबलोली गावात रहदारीच्या ठिकाणी म्हणजेच हॉटेल सिध्दीविनायक या हॉटेल शेजारी आणि आबलोली गावच्या नवलाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या प्रवेश व्दारा समोर श्री.गणेश मंदिरा जवळ भर रस्त्यात खडी टाकण्यात आलेली होती. हि खडी रस्त्यात पसरल्याने अपघात होत होते. तरी अपघात होऊ नये सुरक्षीत वहाने चालवता यावीत यासाठी या रस्त्यावरुन हि खडी ताबडतोब हटविण्यात यावी. तरी आबलोली ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम खाते गुहागर यांनी ताबडतोब हि खडी हटवा व अपघात वाचवा अशी आग्रही मागणी वाहन चालक, पादचारी व ग्रामस्थांकडून आबलोलीतील स्थानिक पत्रकारांकडे करण्यात आली होती. Clearing traffic by removing gravel