गुहागर, ता. 28 : गेले दीड वर्ष रखडलेल्या जलजीवनच्या कामामुळे संतप्त झालेल्या साखरी आगर येथील ग्रामस्थांनी सरपंचांसहित गुहागर पंचायत समितीवर धडक दिली. आठ दिवसात या जलजीवन योजनेचे काम सुरू न झाल्यास गुहागर पंचायत समितीवर हंडा मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे. Citizens angry over Jaljeevan work
गुहागर तालुक्यातील साखरी आगर येथील जलजीवन पाणी योजनेचे काम दोन वर्षापूर्वी सुरू झाले. आत्तापर्यंत 35 टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र त्यानंतर ठेकेदाराने पूर्णता दांडी मारली आहे या पार्श्वभूमीवर साखरी आगर येथील सरपंच दुर्वा पाटील, उपसरपंच सुदाम आंबेकर, रवींद्र पवार, मारुती होडेकर, सुरेश कदम, दीपक पाटील, मधुकर पाटील, विजय भुते आदींनी गुहागर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी शेखर भिलारी यांची भेट घेऊन याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. येत्या आठ दिवसात सदर योजनेचे काम सुरू न झाल्यास गुहागर पंचायत समितीवर सर्व ग्रामस्थांसमवेत हंडा मोर्चा आणण्याचा इशारा दिला आहे. Citizens angry over Jaljeevan work


यावेळी सरपंच दुर्वा पाटील यांनी बोलताना ठेकेदार पुढील काम पूर्ण करण्याकरता कोणतेच उत्तर देत नाही. आज गावातील पाणी समस्या नसली तरी विहिरींवरून हंडेच्या हांडे घेऊन जाताना महिला दिसून येत आहेत यामुळे पाण्याचे हे हाल महिलांना सर्वाधिक सोसावे लागत आहेत अशा स्थितीत जलजीवन योजने करता ग्रामस्थांनी ग्राम सहभाग दिला असून आत्ता ही योजना पूर्ण करण्याकरता ग्रामपंचायतकडे विचारणा करत आहेत. दरम्यान जे पाईप टाकले आहेत त्या पाईपची तोंड बंद न झाल्याने त्या पाईप मध्ये माती व उंदीर असे अनेक प्राणी जाऊन बसले असून सदर पाईपलाईन चोकअप होण्याची शक्यता आहे. तर संबंधित ठेकेदार आमचे कोणाचेच फोन उचलत नाही. यामुळे येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास सर्व ग्रामस्थांनी हंडा मोर्चा आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगितले. Citizens angry over Jaljeevan work
नाहीतर ठेकेदाराला काळा यादीत टाकू
गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी तरुण भारत कडे बोलताना साखरी आगर येथील ग्रामस्थ आपल्याकडे आले होते. जलजीवन चे काम त्यांचे अर्धवट स्थितीत आहे. ही वस्तुस्थिती आहे याबाबत आपण संबंधित ठेकेदारा जवळ संपर्क साधून काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना देणार आहोत. ठेकेदाराने काम करण्यास दिरंगाई केली तर त्याला काळ्या यादीत टाकून त्या बदली दुसरा ठेकेदार देऊन ते काम पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू, असे यावेळी सांगितले. Citizens angry over Jaljeevan work