• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीला रामराम

by Ganesh Dhanawade
September 8, 2022
in Bharat
17 0
1
Wild animal nuisance to agriculture
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.08 :  एकेकाळी जिथे जागा भेटेल त्या ठिकाणी घरापासून दूर रानातही अवघड जागा साफ करून विविध प्रकारची पिके शेतकरी घेत असत. पण गेल्या दहा- पंधरा वर्षात रानाकडे सुद्धा फिरकत नसल्याने रानातील शेती ही संकल्पनाच विसरून गेला आहे. रानटी प्राण्यांच्या उपद्रवामुळे व नुकसानीमुळे रानातली शेती शेतकरी विसरून गेला असला तरी या प्राण्यांचे आक्रमण आता मानवी वस्तीवर होऊ लागले आहे. घराच्या परस बागेत लावलेल्या भाजीपाला ही प्राणी ओरबाडू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे, कौले या छपरांची ही नासधूस होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी यामुळे हैराण झाला आहे. Wild animal nuisance to agriculture

काही वर्षापूर्वी शेतकरी रानात डोंगर उतारावर वाढलेली झाडे तोडून व जागा साफ करून शेती करायचा. तसेच नागली वरीच्या शेतात गवार, काकडी, चिबूड, कारली, भोपळा, दुधी अशा जेवणात आवश्यक असणाऱ्या भाज्या हमखास पिकवायचा. घरात आवश्यक असणाऱ्या वस्तू राखून बाकीच्या बाजारात विकल्या जायच्या. त्यांना गावठी भाजी म्हणून दरही चांगला मिळायचा. गुहागर तालुक्यातील काही मैदानी पठारावरच्या गावातून भुईमुगाची मोठ्या प्रमाणावर पेरणी व्हायची व पीक ही चांगले यायचे. मात्र नागलीवरी पाठोपाठ भुईमुगाचे पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. पठारी भागात आता तीळ ही औषधाला सापडत नाही. नागली भात या बरोबरच जेवणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू शेतकरी आपल्या शेतात पिकवायचा. Wild animal nuisance to agriculture

Wild animal nuisance to agriculture

पण वन खात्याच्या नव्या नियमामुळे रानातील शेतीपेक्षा रानटी लाकडांना मोठे महत्व प्राप्त झाले. त्यामुळे शेती कमी झाली व रानातली जंगल तुटू लागली. त्यामुळे जंगल हाच अधिवास असलेल्य जंगली प्राण्यांचा रोजच्या अन्नाचा घास कमी होऊ लागला. उरल्या सुरल्या शेती पिकांवर त्यांचे आक्रमण होऊ लागले. व सततच्या त्यांच्या त्रासाला व होणाऱ्या नुकसानीला कंटाळून शेतकऱ्यांनी रानातल्या शेतीला रामराम केला. Wild animal nuisance to agriculture

मात्र रानटी प्राण्यांचा त्रास त्यानंतही शेतकऱ्यांना भोगावा लागतच आहे. पावसाळ्यात घराच्या मागे परसबागेत मांडव घालून लावलेले काकडी, चिबूड, कारली, पडवळाचे वेल तोडून माकडे चोरून नेत आहेत. अंगणात तयार झालेली भेंडी व इतर भाजीपाला तयार होण्यापूर्वीच माकडे पळवतात. त्यांना किती हि हाकलले तरी माकडांचा थवा दाद देत नाही. मोठ्या आशेने दारात लावलेल्या व जोपासलेत्या या पिकांची आपल्या डोळ्यादेखत होत असलेली नासाडी शेतक-यांना अस्वस्थ करून जाते. घराजवळ व इतर ठिकाणी भरपूर खर्च करून नारळ व पोफळीच्या तयार झालेल्या झाडांवर चढून माकडे तयार झालेले नारळ सोलून खातात व मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. मात्र उघड्या डोळ्यांनी बघण्या पातिकडे शेतकरी काहीही करू शकत नाही. यामुळे रानातली शेती सोडल्यानंतर दाराशी घरात खाण्यासाठी काही तरी करावे, हि भावना सुद्धा सद्या शेतकऱ्यांच्या मनातून नष्ट होत आहे. Wild animal nuisance to agriculture

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWild animal nuisance to agricultureगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.