• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कोकणचे दुःख कोणी दूर करेल काय?

by Mayuresh Patnakar
November 4, 2022
in Articals
22 0
0
Who will remove the misery of Konkan?
43
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लेखक : अविनाश काळे, ९४२२३७२२१२
कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काहिवर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात नागरिक कष्ट करून स्वर्ग निर्माण करतील. आज लाखो रुपयांचे कष्ट पाण्यात जात आहेत. हे दुःख कोणाला समजेल काय? आंबा राखणीसाठी आज लाखो रुपये खर्च होत आहेत. केळी, भाजीपाला, नारळ, फळभाज्या, फणस, चिकू, पेरू, पपई, शेवगा, कुळीथ, उडीद, इ चे लाखो रुपयांचे उत्पन्न ही जोडी आणि त्यांची प्रचंड वाढलेली जमात फस्त करते. शिवाय नळे, पत्रे फोडणे यांचे नुकसान वेगळे. माकडे तर घरात घुसून नासधूस करायला लागली आहेत. अंगावर येण्याचे धैर्य त्याच्याकडे वाढत चालले आहे. आर्थिक नुकसान , हाकलण्याचे शारीरिक नुकसान आणि वेदना, हतबलता चे मानसिक नुकसान…किती सोसायचे?  

मागे मी पंतप्रधान कार्यालयाकडे याबाबत मांडले होते. त्यावेळी वनाधिकारी माझ्याकडे येऊन नुकसान भरपाई जीआर देऊन गेले. त्यात प्रचंड त्रुटी आहेत. हे त्यांनाही माहीत आहे. पंचनामा त्यावरील सह्या, खाल्लेले नुकसान कसे दाखवणार, राखण साठी होणारा त्रास, नळे, पत्रे फोडलेले इ. बाबत भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती आहे. Who will remove the misery of Konkan?

आज आम्ही कोकण सोडून इतर ठिकाणच्या भाजीपाला, शेवगा, चिकू, पेरू, केळी यांच्या बहरलेल्या बागा पाहतो. आम्ही आंबा, पपई, शेवगा,चिकू, पेरू, केळी, भाजीपाला इ. चे प्रचंड उत्पादन घेऊ शकतो. पण आम्ही हतबल आणि असहाय आहोत. खरतर कुणी वालीच नाही असं झालंय. Who will remove the misery of Konkan?

Who will remove the misery of Konkan?

आज कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही. कारण इथे एक पीक पद्धतीऐवजी बहुपिक पद्धत आहे. दोन माड, दोन फणस, थोडी शेती, दोन कलमे, चार जांबी इ प्रत्येक घरात असल्याने त्याला काहीतरी मिळतं. मात्र आज वानर, माकडांनी त्यावर घाला घातला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील ही परिस्थिती कोणी लक्षात घेईल काय?  Who will remove the misery of Konkan?

या परिस्थितीतून कोकणी माणसाला दिलासा मिळेल काय? माणूस जगला पाहिजे की प्राणी जगला पाहिजे हे सुद्धा एकदा ठरवण्याची गरज आहे. सरकार उपद्रवी पशु म्हणून वानर, माकडे याना जाहीर करेल काय? असा प्रश्न अविनाश काळे यांनी उपस्थित केला आहे. Who will remove the misery of Konkan?

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWho will remove the misery of Konkan?गुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.