संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली आणि खोडदे गावातून धो – धो वाहणाऱ्या वाकी नदीचे पाणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच आटले असून विहीरींच्या पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे जनावरांना आणि माणसांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. Water scarcity


याच वाकी नदीच्या पाण्यावर निर्मल ग्रामपंचायत आबलोलीची नळपाणी पुरवठा योजनेची विहिर अवलंबून आहे. त्या विहिरीच्या पाण्याची पातळी घटली आहे त्यामुळे आतापासूनच मे महिन्यातही पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. आताचा प्रचंड वाढता उष्मा आणि हवामानातील बदलामुळे जनावरांसह माणसांनाही पाण्याची खूपच गरज लागणार हे नक्कीच, अशावेळी धो – धो वाहणाऱ्या वाकी नदीचे पाणी आटल्याने पाणी टंचाई खूपच जाणवणार आहे. Water scarcity