वातावरणातील बदलांचा परिणाम; नौका मालक आर्थिक अडचणीत
रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी जिल्ह्यात मासेमारी नौकांसह मासळीचे उत्पादनही गतवर्षी कमी झाले आहे. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्यावर्षी २०२२-२३ मध्ये ४१६ मच्छीमार नौका कमी झाल्या आहेत. त्याचवेळी मासळीचे उत्पादनही ३८,५११ मेट्रिक टनांनी कमी झाले आहे. Threat to fishing business in the district
मासळीची घटती उत्पादकता आणि नौकांची कमी होणारी संख्या यामुळे मासेमारी व्यवसायाला आता घरघर लागली आहे. जिल्ह्यात मासेमारी उद्योग महत्त्वाचा मानला जात असला तरी गेल्यावर्षी मासेमारी उद्योगातील नौकांचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून अपेक्षित मासळीचा ‘रिपोर्ट’ मिळत नसल्याने मासेमारी नौका विकण्याकडे कल वाढला आहे. Threat to fishing business in the district
मासेमारीच्या हंगामात अनेक नैसर्गिक संकटांमुळे मासेमारीचे दिवस वाया जात असल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांनी नौका विकण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात सन २०२१-२२ मध्ये २,९३६ मासेमारी नौका होत्या. त्यामध्ये २,२५२ यांत्रिकी नौका होत्या. या मासेमारी नौकांना त्या वर्षात १ लाख १२ हजार २८ मेट्रिक टन मासे मिळाले होते. तर सन २२-२३ मध्ये २,५२० नौका राहिल्या. या नौकांना केवळ ६२,७१७ मेट्रिक टन इतकेच मासे मिळाले. सन २०२१-२२ च्या तुलनेत गेल्या वर्षात मच्छीमार नौका ४१६ ने कमी झाल्या. तरी मासळी मिळण्याचे प्रमाण ३८,५१८ मेट्रिक टनांनी कमी झाले. Threat to fishing business in the district