११ वर्षांत ९० बिबट्यांचा मृत्यू; ७५ बिबट्यांची वनविभागाकडून सुटका
रत्नागिरी, ता. 27 : रत्नागिरी परिक्षेत्रात गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत मानव-वन्यजीव संघर्ष आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बिबट्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या ११ वर्षांत विविध कारणांमुळे एकूण ९० बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. तर, वन विभागाने ७५ बिबट्यांची सुखरूप सुटका करून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. The existence of leopards is in danger.
डोंगराळ व जंगल भागात वाढती वाहतूक आणि मानवी हस्तक्षेप यामुळे वन्य प्राण्यांची वसतिस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. जंगल तोडून मोठमोठी शहरे वसविली जात आहेत. परिणामी सध्या ग्रामीण भागांबरोबरच आता शहराच्या मध्यवर्ती भागात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. तसेच पाळीव किंवा मोकाट जनावरे ही बिबट्यांना आयते खाद्य मिळत असल्याने बिबट्यांचा मोर्चा मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वळला आहे. बिबट्याच्या भीतीने फासक्या लावल्या जात आहेत. मात्र, यात अडकून बिबट्यांचा मृत्यू होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच रस्त्यावरील गाड्यांच्या धक्क्याने आणि जंगलातील त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने त्यांची उपासमार होऊ लागल्यानेही बिबट्यांचा मृत्यू होऊ लागला आहे. The existence of leopards is in danger.
एकंदरीत रस्ते अपघात, फासक्यात अडकून, उघड्या विहिरीत पडल्याने, उपासमारीमुळे, जखमी झाल्याने, शिकारीत आणि नैसर्गिक अशा विविध कारणांमुळे गेल्या अकरा वर्षात तब्बल ९१ बिबटे मृत झाले आहेत. या अकरा वर्षात फासकीत अडकलेल्या, विहिरीत पडलेल्या तसेच अन्य ठिकाणी अडकलेल्या अशा एकूण ७५ बिबट्यांना वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करून वाचवले आहे. २०२० मध्ये सर्वाधिक १८ बिबट्यांचा मृत्यू झाला होता. तर, वर्ष २०२४ मध्ये सर्वाधिक १६ बिबट्यांची सुखरूप सुटका करून जंगलात सोडण्यात वन विभागाला यश आले आहे. The existence of leopards is in danger.
