गुहागरातील 66 ग्रामपंचायतींसाठी 22 एप्रिलला सोडत
गुहागर, ता. 18 : गुहागर तालुक्यातील 66 सरपंच नियुक्तीसाठीच्या आरक्षणाची सोडत 22 एप्रिलला करण्यात येणार आहे. हे आरक्षण 2025 ते 2030 या कालावधीसाठी असेल. हा सोडत कार्यक्रम श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे येथे होणार आहे. आगामी निवडणुकीत ग्रामपंचायतीचा कारभार हाकण्यास इच्छुक असलेल्यांचे लक्ष या सोडतीकडे लागून राहीले आहे. Reservation of Sarpanch on 22 April
रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याच्या सूचना 11 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाल्या. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात तहसीलदारांना सूचना करुन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. त्याप्रमाणे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आता तालुकानिहास सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. Reservation of Sarpanch on 22 April
गुहागरचे तहसिलदार परिक्षीत पाटील यांनी तालुक्यातील 66 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी 22 एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 22 एप्रिलला सकाळी 11.00 वा. श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे येथे हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिला सरपंच पदासाठी कोणत्या ग्रामपंचायती आरक्षित होणार, कोणत्या ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार हे ठरणार आहे. लॉटरी पध्दतीने चिठ्ठ्या टाकून ही प्रक्रिया केली जाईल. Reservation of Sarpanch on 22 April


गुहागर तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधीही लागु शकतात. अनेकांनी आरक्षण मिळाले तर थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उभे रहाण्याची तयारी आधीपासूनच सुरु केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमध्ये आपण उमेदवार असलो तर कोण मत देईल, कोण देणार नाही याचे गणित बांधले जात आहे. म्हणूनच या सर्वांचे लक्ष आता या आरक्षण सोडतीकडे लागून राहीले आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका 2026 – 27 मध्ये किंवा त्यापुढे होणार आहेत त्या ग्रामपंचायतीमधील कार्यकर्त्यांना सरपंच पदाची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. म्हणून त्यांचेही लक्ष या सोडतीकडे असणार आहे. Reservation of Sarpanch on 22 April
सरपंच पदाची सोडत होणार याचा अर्थ लवकरच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होणार, मग त्यापाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील. सध्या कोणतीही निवडणूक नसल्याचे आपापल्या उद्योग धंदा, नोकरीत मग्न असलेले कार्यकते; पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या मानसिकतेत जावू लागतील. त्याची नांदीच सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीच्या निमित्ताने झाली आहे. Reservation of Sarpanch on 22 April