• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे अन् महावितरणची कसोटी

by Guhagar News
May 22, 2025
in Maharashtra
141 2
4
Reasons for power outages
277
SHARES
792
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी ता. 22 : यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित होणे हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे. तेवढेच महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना देखील नकोसे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंते व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. परंतु कोणत्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी वीजयंत्रणेमधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. Reasons for power outages

ज्या भागात उपरी (ओव्हरहेड) वीजवाहिन्या आहेत, तेथील वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर तसेच डबलपोल स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनी मातीचे असतात. विजेचा प्रवाह लोखंडी वीजखांबात उतरू नये यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनी मातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीज प्रवाह खंडित होतो. Reasons for power outages

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारण म्हणजे वादळ वाऱ्यांमुळे वीजयंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे. वीज कोसळणे वा कडकडाटामुळे दाब वाढणे तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने फिडर पिलर, रिंग मेन युनिट अशा वीजयंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो. Reasons for power outages

काही ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डा काढण्याचे काम करताना भूमिगत वाहिन्या तोडल्या जातात व वीजपुरवठा खंडित होतो. तर काही भूमिगत वाहिन्याचे थोडेफार नुकसान होते. मात्र वीजपुरवठा खंडित होत नाही. परंतु पावसाला सुरवात झाली की साचलेले पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व बिघाड होतो. किंवा संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधणे, दुरूस्तीसाठी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट लावणे आदी कामे वेळखाऊ असतात व वीजपुरवठा सुरळीत करण्यसाठी जास्त वेळ लागतो. तथापि महावितरणचे कर्मचारी सदर काम कोणतीही विश्रांती न घेता करतात. Reasons for power outages

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डबल पोल स्ट्रक्चर अशा वीजयंत्रणेजवळ घरगुती सुका व खाद्य पदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात. वीजयंत्रणेला या प्राण्यांचा स्पर्श झाला की शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. Reasons for power outages

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वप्रथम पर्यायी वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्रांशी संपर्क करणे, बिघाड शोधण्यासाठी पेट्रोलिंग करणे, झाडे, फांद्या हटविण्यासाठी विविध यंत्रणेशी समन्वय साधणे, दुरूस्ती कामांसाठी वीजसुरक्षेचे परमीट, अंतर्गत संपर्क, साहित्य व इतर पाठपुराव्याची विविध कामे आदींसाठी स्थानिक अभियंते किंवा जनमित्रांचे मोबाईल प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सातत्याने व्यस्त असतात. Reasons for power outages

त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देण्याची किंवा मोबाइलवरून NOPOWER<ग्राहक क्रमांक> हा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. Reasons for power outages

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खऱ्या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचाऱ्यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचा बिघाड शोधणारे, अविश्रांत दुरूस्तीचे काम करणाऱ्या अभियंते व जनमित्रांसाठी पावसाळी दिवस अतिशय आव्हानात्मक आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. Reasons for power outages

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarReasons for power outagesUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share111SendTweet69
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.