पाण्याअभावी रोपे सुकली तर काही जमीनदोस्त, लागवडीचे तीनतेरा
गुहागर, ता. 12 : गुहागर-विजापूर मार्गावरील देवघर ते गुहागर दरम्यान, झालेल्या रस्ता रुंदीकरणानंतर दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली. मात्र, ही लागवड केवळ देखावा ठरली आहे. पाण्याअभावी रोपे सुकून गेली असून काही रोपे सभोवतालचे कुंपण तुटून जमीनदोस्त झालेली पहायला मिळत आहेत. Plants withered due to lack of water

रस्ता रुंदीकरणाला यापूर्वीची दुतर्फा असलेले महाकाय वृक्ष अडथळे ठरलेले असल्याने विसावा देणारी ही झाडे तितकीच महत्वाची होती. मात्र, रुंदीकरणामुळे ही झाडे तोडावी लागली. यामुळे संपूर्ण महामार्ग भकास व ओसाड वाटत होता. यानंतर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्यासभोवती बांबूच्या काट्या उभ्या करण्यात येऊन नेटची जाळी बांधण्यात आली. या रोपांना टँकरने अधूनमधून पाणीही दिले जात होते. मात्र, ही रोपे अलिकडे सुकून गेलेली दिसून येत आहेत तर काही रोपे जमीनदोस्त झालेली आहेत. तसेच रोपांभोवतीच्या उभ्या काट्या व कापडही गायब झालेली आहेत. या लागवडीत आणखी एक फसवणूक म्हणजे नवीन रोपे लागवड केलेली आहेत असे दाखवून पूर्वीच्या जुन्या जगलेल्या झाडांनाच जाळीचे कापड गुंडाळलेले आहेत. एकूणच लागवड केलेली रोपे जगणार कशी असा सवाल उपस्थित होत आहे. Plants withered due to lack of water
