मुंबई, ता. 23 : नैऋत्य ‘मॉन्सून’ केरळमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यालगत असलेल्या मध्य, पूर्व अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते सध्या स्थिर आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. Monsoon to arrive in Kerala in two days


रायगड, रत्नागिरीमध्ये आज शुक्रवारी मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या दोन्ही जिल्ह्यांना ‘रेड’ अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी विजांचा कटकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरण अनुकूल नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही उर्वरित भागांमध्ये, मालदीव आणि कोमोरॉन क्षेत्राच्या उर्वरित भागांमध्ये, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, तसेच दक्षिण-मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. Monsoon to arrive in Kerala in two days


रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी राहणार असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. 25 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईत साधारण 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. Monsoon to arrive in Kerala in two days