गुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह सोसायटी गांधी मैदान जवळ कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रा.शिवाजी शिंदे सचिव मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक गोपाल सहर शर्मा गुजरात यांचे हस्ते संमेलन उदघाटन झाले तर प्रतिमा पुजन डॉ .श्रीकांत पाटील कादंबरीकार घुणकी यांच्या हस्ते झाले. Marathi Rural Literary Conference at Kolhapur


त्यावेळी प्रमुख पाहुणे रत्नागिरी लेखक डॉ.बाळासाहेब लबडे, शाहीर शाहिद खेरटकर चिपळूण, कवी दीपक पवार रुकडी, हे मान्यवर उपस्थित होते . संमेलनाचे उद्घाटक प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ गोपाल सहर शर्मा म्हणाले की, ,”गाव म्हणजे आपल्या संस्कृतीची उगमभूमी आहे. औद्योगिकीकरणानंतर गावांमधून युवकांचे जो पलायन सुरू झाले – ते अजूनही थांबलेले नाही. शहरांनी अनेक तरुणांना गिळंकृत केलं. आता सीमेंटच्या जंगलांनी शेतजमीन झाकली आहे. पण तो दिवस लांब नाही, जेव्हा या इमारती पाडून पुन्हा शेतं तयार करावी लागतील. शहरातही जमीन असते आणि गावातही. पण गावातील शेतकऱ्याचं नातं मातीशी असतं, तर शहरी बिल्डरचं नातं केवळ नफ्याशी. Marathi Rural Literary Conference at Kolhapur
ग्रामीण साहित्य इत्रसुगंधाने नव्हे, तर मेहनतीच्या घामाच्या खाऱ्या वासाने भरलेले असते.
प्रेमचंद म्हणतात – “तुम्ही फावडे चालवता, मी लेखणी चालवतो – पण मीही एक शेतकरी आहे!” सदर साहित्य संमेलनात कवि सरकार इंगळी यांचा कवी सरकारांच्या लावण्या हा लावणी संग्रह अशोक मोहिते बार्शी यांचा काव्य बहार काव्यसंग्रह प्रा . गोविंद लहाने परभणी यांचा काव्यरेखा काव्यसंग्रह ह .भ.प . विना उर्फ दिपाली महाडिक खेड यांच्या गंध तुझ्या आठवणींचा काव्यसंग्रह कु . कल्याणी भोसले कोरोची यांचा काव्य कल्याणी काव्यसंग्रह तसेच साहित्यिकाला संमेलन विशेषांकाचे प्रकाशन लेखक तानाजी आसबे वाळवे खुर्द आणि मान्यवरांच्या हस्ते करणेत आले. डॉ शिवाजी शिंदे, डॉ श्रीकांत पाटील तानाजी आसबे, शाहीर शाहिद खेरटकर, बाळासाहेब लबडे यांनी आपले मनोगत मांडताना साहित्य विषयी आपले मार्मिक विचार मांडून साहित्यिक यांना मार्गदर्शन केले. Marathi Rural Literary Conference at Kolhapur
दुपारच्या सत्रात परिसंवाद गावगाड्यातील माणसे आणि साहित्य या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा अमरनाथ कांबळे अतिग्रे साहित्यिक विचारवंत हे होते. सौ सुष्मिता रेंदाळकर पुणे व कवी भाऊसो कांबळे ममदापूर व दत्तात्रय भापकर मुंबई यांनी सहभागी घेतला त्यांनी ग्रामीण भागातील रुढी -परंपरा व गावगाडातील व्यक्ती चित्रण या विषयी आपले विचार मांडले. Marathi Rural Literary Conference at Kolhapur


तिसऱ्या सत्रात कवी दीपक पवार रुकडी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले कवी संमेलन अध्यक्ष दिपक पवार रुकडी यांनी आपल्या मातीशी नाळ जोडली गेली पाहिजे. असे सांगून संमेलतात ज्यांचे ‘ काव्य संग्रह प्रकाशित केले आहे . त्यांच्या पुस्तका विषयी माहिती करून दिले. सदर कवि संमेलनात महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली पुणे सातारा रत्नागिरी छ संभाजीनगर धाराशिव मुंबई सोलापूर अनेक जिल्ह्यातून कवी कवयित्री यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना डॉ शिवाजी शिंदे, अशोक भोईटे ‘राजू पोतदार सह इतर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. सुत्रसंचालन दिपक पवार, रुकडी विद्या खामकर गारगोटी सुरेखा वाडकर इंचलकरंजी प्रा अमरना कांबळे यांनी केले. Marathi Rural Literary Conference at Kolhapur