• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे व्याख्यान

by Guhagar News
August 17, 2022
in Ratnagiri
16 0
0
Lecture given by karadhe brahamn sangha
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भारतीय संस्कृती उच्च प्रतीची असल्यानेच टिकून; विनोद केतकर

रत्नागिरी, ता.17 : भारतावर ७०० वर्षे मोगलांनी अत्याचार केले, आक्रमण केले. १५० वर्षे इंग्रजांनी राज्य केले तरीही आपली संस्कृती आजही टिकून आहे. कारण ही संस्कृती उच्च प्रतीची आहे. भारतीय संस्कृती मानवतेचा विचार करणारी आहे. जे शिकलात ते आचरणात आणा. भ्रष्टाचार दूर करायचा असेल तर शिक्षण तसे असले पाहिजे. शिक्षण, वैद्यकीय, संरक्षण आणि राजकारण या क्षेत्रात तडजोड करू नका. प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे देवरुख प्रखंड मंत्री, योगशिक्षक, कारसेवक विनोद केतकर यांनी केले. Lecture given by Karhade Brahmin Sangha

स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली. अनेक क्रांतीकारक इंग्रजांना सापडले नाहीत, ते आपल्यालाही माहिती नाहीत. शिपोशी गावात गणेश गोपाळ आठल्ये नावाचे क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी बाँब स्फोट तंत्रज्ञान भारतात आणले, असे सांगितले जाते. त्यांच्याविषयीची माहिती केतकर यांनी दिली. Lecture given by Karhade Brahmin Sangha

Lecture given by karadhe brahamn sangha

असंख्य क्रांतिकारक होऊन गेले त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. कोणतीही रक्कम, आर्थिक फायदा स्वातंत्र्यसैनिकांना होत नव्हता. त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवूनच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झटत होते. स्वातंत्र्ययुद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांनाच पूज्यस्थानी होता. ७५ वर्षे कालखंड सिंहावलोकन करताना भारतात भरपूर प्रगती झाली. स्वातंत्र्यानंतर काही विचारवंतांनी देश मागास राहील, एकसंघ राहणार नाही, लोकशाही टिकणार नाही असे विचार मांडले होते. परंतु भारताने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली. आपल्याला स्वातंत्र्य टिकवून अजून पुढे जायचे आहे. लोकशाही टिकली पाहिजे व ती अधिक बळकट झाली पाहिजे. एखादा रुग्ण डॉक्टरांकडे गेला की पैसे नसल्यामुळे किलोभर तांदूळ देतो. कोणतीही गोष्ट फुकट घ्यायची नाही, हे अर्थशास्त्र गावातल्या माणसालाही समजते, असे त्यांनी सांगितले. Lecture given by Karhade Brahmin Sangha

यावेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, भारतमाता पूजन करणाऱ्या संजीवनी विलणकर, संस्कार भारतीच्या अध्यक्ष श्रुती दात्ये उपस्थित होत्या. श्रद्धा तेरेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी आभार मानले. Lecture given by Karhade Brahmin Sangha

प्रत्येक घरात भारतमाता पूजन व्हावे
संजीवनी विलणकर म्हणाल्या की, चीनच्या युद्धावेळी मी तिसरीत असताना प्रभातफेऱ्या, घोषणा समरगीते म्हणायचो. त्यावेळी देश काय आहे हे कळले. निवृत्तीनंतर महावितरणकडून चांदीचे नाणे मिळाले. त्यावेळी मी विवेकानंद वाचत होते. या विश्वात छोटे छोटे देश आहेत आणि भारतभूमी ही या विश्वाचे देवघर आहे. हे वाक्य लिहून ठेवले होते. मग चांदीच्या नाण्यापासून भारतमातेची मूर्ती करून घेतली व नित्यपूजा सुरू केली. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला भारतमाता सांभाळते. एका नजरेत भारत पाहायला मिळावा. म्हणून प्रत्येक राज्यातली माती साठवली आहे. घरोघरी तिरंगा अभियान सुरू आहे. आता प्रत्येक घरात भारतमातेचे पूजन व्हावे. Lecture given by Karhade Brahmin Sangha

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLecture given by karadhe brahamn sanghaMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.