रत्नागिरी, ता. 30 : कृषी दिनापासून रत्नागिरीत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये १ ते ७ जुलैपर्यंत नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July

स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २०१५ पासून नारळ झाडाचे व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करत आहे. नारळ पाडपी न मिळणे, रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीची लागण, गेंड्या भुंग्याचे आक्रमण यामुळे नारळ बागायतदार त्रस्त झाले आणि हतबल झाले आहेत. विविध समस्यांच्या व्यवस्थापनासाठी येणारा खर्च सुरुवातीला उत्पन्नापेक्षा जास्त होतो म्हणून अनेक जण कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाकडेच लक्षच देत नाहीत. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July
नारळ झाडाच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी आणि नारळाच्या झाडाच्या योग्य नियोजनासाठी स्वराज्य ॲग्रो कंपनीने १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कल्पवृक्ष सप्ताहाच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या सप्ताहात दररोज सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत २०३, श्रम साफल्य, मनीषा टायपिंग सेंटरच्या वर, दुसरा मजला, खालची आळी, रत्नागिरी येथे शिबिर होईल. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July

नारळ झाड मालकांनी या कल्पवृक्ष सप्ताहात सामील व्हावे. शिबिराला येताना मोबाइलमध्ये नारळाच्या झाडांचे झावळीजवळचे आणि बुंध्याजवळचे फोटो काढून आणावे, असे आवाहन कंपनीने केले आहे. अधिक माहितीसाठी 9607 192 912 किंवा 8080 188 218 या क्रमांकांवर संपर्क साधावा. Kalpavriksha Week in Ratnagiri from 1st July
