उद्योजक निलेश चव्हाण, कुटगिरी वीरवाडी येथील नूतन सभागृहाचे उद्घाटन
गुहागर, ता. 21 : एकजुटीची अभेद्य भिंत कशी असते आणि शिक्षण, संघटन आणि संघर्ष यासाठी काम कसे केले जाते हे अमर ज्योती क्रांती मंडळ वीरवाडी कुटगिरी यांच्याकडून अनुभवण्यास मिळाले. येथील एकीची भावना आणि परिश्रम घेण्याची वृत्ती याचे दर्शन याच सभागृहाच्या वास्तूमधून होत आहे, असे गौरवोद्वार स्कॉन प्रायव्हेट लि. कंपनीचे संस्थापक उद्योजक निलेश चव्हाण यांनी काढले. Inauguration of a new hall at Kutagiri


गुहागर तालुक्यातील अमर ज्योत क्रांती मंडळ कुटगिरी वीरवाडी यांच्यावतीने बांधण्यात आलेल्या कै. बाळाजी लखोजी वीर स्मृती सभागृहाचे उद्घाटन उद्योजक निलेश चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला मुंबई मंडळाचे अध्यक्ष दिनेश हुमणे, पोलीस पाटील सुधाकर खेतले, माजी सरपंच विशाखा अवेरे, समीर डिंगणकर, बांधकाम व्यवसायिक निलेश बोबले, उपसरपंच सुरेश खेतले, राजू थरवळ, स्थानिक मंडळ अध्यक्ष सुभाष निवाते, डॉ विजय, डॉ. भारती वीर, प्रकाश वीर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. Inauguration of a new hall at Kutagiri


वीरवाडी मध्ये अतिशय सुंदर अशी वास्तू उभी करण्यात आली आहे. इथे एक वेगळेपण दिसून आले की, या वास्तू मधील प्रत्येक भिंतीला समर्पक असे एक नाव देण्यात आलेले आहे. ही संकल्पनाच मनाला आनंद देणारी आहे. यामध्ये सेवाभावी भिंत, एकजुटीची अभेद्य भिंत, सामर्थ्य स्वाभिमानाची भिंत आणि वासल्य सिंधूची भिंत अशा प्रकारची नावे या भिंतींना देऊन एक आगळी वेगळी संकल्पना मांडण्यात आली. प्रथम याच गावामध्ये विरवाडीमध्ये ही संकल्पना पाहायला मिळाली आहे. यातूनच या मंडळाच्या वैचारिक पातळीची क्षमता दिसून येते असे मत व्यक्त करुन उद्योजक चव्हाण यांनी गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच मदतीचा हात देऊ, असे वचन दिले. Inauguration of a new hall at Kutagiri