मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सव संपन्न
रत्नागिरी, ता. 20 : मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युवा महोत्सवात अंतिम फेरीत साक्षी चाळके हिने कथाकथन स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ती चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराची विद्यार्थिनी आहे. चाळके हिच्या यशबाबत तिचे अभिनंदन करण्यात आले. अंतिम फेरीत साक्षी चाळके हिने श्रीनिवास पानसेचे अंगण ही कथा सादर केली होती. या स्पर्धेसाठी एकुण ४१ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. Gold Medal for Chalke in Storytelling

मुंबई विद्यापीठाची युवा महोत्सवाची अंतिम फेरी मुंबई येथील विद्यार्थी भवन येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी एकुण ४१ स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. त्यामध्ये चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराची साक्षी चाळके हिने श्रीनिवास पानसेचे अंगण ही कथा सादर करुन यश संपादन केले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून राहुल वैद्य व शुभांगी भुजबळ यांनी काम पाहिले. यावेळी प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, उपपरिसराचे प्रभारी कुलसचीव अभिनंदन बोरगावे, प्रा आरती दामले, प्रा.सोनाली मेस्त्री यांनी साक्षीचं अभिनंदन केले. Gold Medal for Chalke in Storytelling

