गुहागर, ता. 16 : सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करून जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता गठित करण्यात आलेल्या ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती, रत्नागिरी’ या समितीच्या ‘उपाध्यक्ष’ पदी डॉ. विनय नातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Dr. Natu appointed as Vice President of Sindhuratna

विनयजींच्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक अनुभवामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. या नव्या जबाबदारीची घोषणा झाल्यानंतर डॉ. विनय नातू यांचे सर्वांनी अभिनंदन केले आहे. Dr. Natu appointed as Vice President of Sindhuratna
