२१ ट्रान्सफार्मर जळाले, १४५ वीजखांब पडले, वीजवाहिन्यांचेही नुकसान
गुहागर, ता. 29 : या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत गुहागर तालुक्याच्या महावितरण विभागाला ५० लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामध्ये २१ ट्रान्सफार्मर जळाले तर १४५ वीजखांब पडले असून वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. Heavy rains hit Guhagar Mahavitran
यावर्षी जूनपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. जुलै महिन्यात तर अतिवृष्टीने सर्वच स्तरावर मोठे नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात रस्त्यांवर झाडे उन्मळून पडणे, दरड, मातीचा भराव कोसळणे, घरांची पडझड अशी कितीतरी आपत्ती कोसळलेली आहे. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत गुहागर तालुक्याचे सुमारे १ कोटीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. याचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला होता. Heavy rains hit Guhagar Mahavitran


तालुक्यात १२२ गावांमध्ये शृंगारतळी सबस्टेशन विभाग वगळता आबलोली, रानवी, तळवली, हेदवी, वेळणेश्वर या सबस्टेशन अंतर्गत येणारी बहुतांश गावे गेली ३ दिवस अंधारात आहेत. या महिन्यात २१ ट्रान्सफार्मर जळाले असून त्यांचे ३५ लाखांचे तर १४५ वीजखांबांचे ८ लाख ४० हजार एवढे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष करुन जुने, जीर्ण वीजखांबांचीच जास्त प्रमाणात पडझड झाली आहे. अशा स्थितीत महावितरणने आलेल्या आपत्तीला सामोरे जात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. Heavy rains hit Guhagar Mahavitran
दरम्यान, शृंगारतळी सबस्टेशनच्या अखत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये उन्हाळ्यामध्येच देखभाल दुरुस्तीवर येथील सहाय्यक अभियंता मंदार शिंदे यांनी भर दिल्याने यावर्षी अतिवृष्टीत महावितरणचे नुकसान टळले. ज्या विभागात महावितरणचे नुकसान झाले आहे तेथे ट्रान्सफार्मर बदलणे, वीजखांब उभे करणे ही कामे युध्दपातळीवर सुरु झाली आहेत. Heavy rains hit Guhagar Mahavitran