गंजलेले पोलने अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण; महेंद्र आरेकर
गुहागर, ता. 05 : मोडकाआगर येथील नारळ सुपारी व काजूच्या बागेतील 11 केव्ही असलेल्या लाईनचे दोन पोल पूर्णपणे गंजले असून ते कधीही कोसळू शकतात. यामुळे हे पोल बदलण्याची मागणी गेले दहा वर्ष बागायतदार महेंद्र आरेकर करत आहेत. मात्र महावितरण याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. Mahavitran neglect of rusty poles

मोडकाआगर येथील महेंद्र आरेकर यांच्या बागेतील पोल मुळे सुपारी, काजूचे सुमारे वीस लाखाचे नुकसान या दहा वर्षात झालेले आहे. त्यातच गंजलेल्या पोलमुळे कोणता अनर्थ घडला तर त्याला जबाबदार कोण. या 12 एकर बागेत पाणी, खत घालण्यासाठी कामगारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या बागायत मध्ये 11 किवी महावितरणची लाईन गेलेली आहे. या लाईन मध्ये चार पोल गंजलेले असून त्यातील दोन पोल पूर्णता: गंजलेले आहेत. निव्वळ वायरीवर हे पोल उभे आहेत. हे बदलण्याची मागणी गेली दहा वर्ष गुहागर, चिपळूण व रत्नागिरी महावितरण कार्यालयात प्रत्यक्ष भेटून व लेखी करत आहेत. परंतु पोल बदलु अशी आश्वासने देऊन महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. Mahavitran neglect of rusty poles

आज-काल बागायत करताना खत, पाणी यासाठी प्रचंड पैसा खर्च होत असतो. यातच रानटी प्राण्यांचा त्रास होत असून तसेच महावितरण सुद्धा दुर्लक्ष करत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागावी, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. Mahavitran neglect of rusty poles
