गुहागर, ता. 23 : कोट्यवधींच्या विकासकामावरील निधीला स्टे देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे, हे कुठल्या तोंडाने सांगतात असा सवाल करुन जनतेची कामे करत नसाल तर आमच्या मतदार संघातील कर घेणे बंद करा, असा हल्लाबोल आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर केला आहे. गुहागरमधील जिल्हा परिषद पंचायत समिती गटाची आढावा बैठक रविवारी पाटपन्हाळे येथील पूजा मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. MLA Jadhav attacked the government


सत्ता यावी म्हणून भाजप मागील ४०-५० वर्षांपासून प्रयत्न करत होती. मात्र, सत्ता आल्यानंतर राज्यात पहिल्या बाकावर बसणारे सर्व मंत्री हे दुसऱ्या पक्षातून घेतलेले आहेत. भाजप पक्ष नेतृत्वाचे हे सगळ्यात मोठे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. सिनेटचे अर्ज भरल्यानंतर निवडणुका रद्द केल्या यावरुनच भाजप निवडणूक घ्यायला घाबरते असे सिध्द झाले आहे. मणिपूरच्या घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत मौन पाळल्याच्या मुद्द्यावर आम. जाधव यांनी त्यांची नक्कल केली. MLA Jadhav attacked the government


गुहागर मतदार संघातील कुणबी समाजावरील राजकीय भाष्य करताना ते म्हणाले, निवडणूक आली की, गुहागर मधील कुणबी समाजाला चालवलं जातं, यामागे नेमकं कोण? असा सवाल उपस्थित करुन जिल्ह्यातील कुठल्याच भागात कुणबी समाज जागा मागत नाही, पण गुहागर मध्येच का? उदय सामंत सांगतात म्हणून, असा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. गुहागरची जागा पुन्हा भाजपकडे देण्याचा हा डाव असून सहदेव बेटकर यांचा रामदास कदम यांनी वापर करून सोडून दिल्याचाही त्यांनी आरोप केला. राज्याच्या राजकीय स्थितीवर टीका करताना आ. जाधव म्हणाले, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर खोटे आरोप करून भाजपने नेस्तनाबूत केले आहे. MLA Jadhav attacked the government
किशोरी पेडणेकर यांना जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्या भाजपच्या लोकांना कॅगने दिलेला अहवाल म्हणजे एकप्रकारची चपराक आहे. भाजप हा आता किरीट सोमय्या पक्ष झाला आहे. नकली मालाचा पक्ष म्हणून नितीन गडकरी यांनीच मान्य केलं आहे. भविष्यात या नकली मालासोबत निवडणूक लढवायच्या आहेत, अशी टीका त्यांनी केली. MLA Jadhav attacked the government