गुहागर तहसिलदारांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
गुहागर ता. 24 : तालुक्यातील पालशेत समुद्रकिनारी आंबोशी नदीच्या मुखाजवळ अडकलेले बार्ज पालशेतवासीयांसाठी पावसाळ्यात आपत्ती ठरू शकते. सदरील बार्ज हटवीण्यासाठी गुहागर तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी आपत्तीदर्शक बार्जची माहीती देत जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन ) यांच्याकडे बार्ज हटविण्यासाठी संबंधीत यंत्रणेला आदेश देण्याची मागणी केली आहे. Demand of Guhagar Tehsildars to Collector


गुहागर तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी पालशेत समुद्रकिनारी कॅप्टन संजय उगलमुगले बंदर विभाग रत्नागिरी यांच्यासमवेत बार्ज सीबी १००-०१ ची पहाणी केली. त्यानंतर पालशेत गावातील या आपत्तीदर्शक बार्जमुळे होणाऱ्या परिणामाबाबत जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी पत्र पाठविले आहे. यामध्ये पालशेत आंबोशी नदीच्या मुखाजवळ समुद्रामधून गेल्यावर्षी १८ जुलै २०२२ रोजी हे बार्ज वाहून आले होते. सदर बार्ज पुन्हा समुद्राच्या पाण्यातून वाहुन जाऊ नये म्हणून सदर बार्ज समुद्रकिनारी अँकर व रोपच्या सहाय्याने बांधुन ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळामध्ये सदर भरती ओहटीमध्ये समुद्राच्या प्रवाहामध्ये बदल झाल्याने त्या बार्जला लावण्यात आलेले अँकर नदीच्या पाण्याच्या प्रवाहाखाली गेले आहे. यामुळे नदीच्या मुखाजवळील पाणी नदीमार्गे समुद्रामध्ये ये जा करणे पूर्णपणे थांबले आहे. परिणामी नदीलगतच्या लोकवस्तीमध्ये पाणी साचून राहील्याने त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तसेच सदर बार्ज समुद्राच्या उधाणाऱ्या लाटा आल्यानंतरही उलटी होवून आंबोशी नदीकिनारी असणाऱ्या लोकवस्तीस धोका होण्याची शक्यता आहे. पावसाळयामध्ये अतिवृष्टीमध्ये तसेच समुद्राची येणारी भरतीचे पाणी एकदम या नदीपात्रात घुसले तर मात्र पालशेत बाजारपेठेसह नदीपात्रालगतच्या इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो. Demand of Guhagar Tehsildars to Collector


सन २०२० मध्ये पालशेत बाजार पुल धोकादायक ठरला होता. यामुळे बार्जमुळे संभाव्य निर्माण होणारी वस्तुस्थिती लक्षात घेता संबंधित यंत्रणेकडून सदरचा बार्ज तात्काळ हटविण्याबाबत सुचना निर्गमित होण्यास विनंती असल्याचे म्हटले आहे. गृह विभाग (बंदरे परिवहन ) विभागाकडून बार्ज कटींग करून काढण्यास परवानगी दिली आहे. Demand of Guhagar Tehsildars to Collector
पालशेत समुद्रकिनारी नदीच्या मुखाजवळ अडकलेले बार्ज काढण्यासाठी गृह विभाग ( बंदरे परिवहन ) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांनी परवानगी दिली आहे. यासाठी सीमा शुल्क भवन दाभोळ बंद यांनी ९ जून रोजी तब्बल २४ लाख ४४ हजार सीमा शुल्क भरणा केला आहे. यामुळे सदर बार्ज काढून टाकून त्याचे विघटन करून ते भंगारात काढून टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. Demand of Guhagar Tehsildars to Collector