डॉ. विनय नातू, प्रत्येक बुथवर होणार जनसंपर्क अभियान
गुहागर, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या 9 वर्षात राबविलेल्या सर्व योजना गुहागर मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप कार्यकर्ते करणार आहेत. अशी माहिती उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत दिली. Plans of the center will be conveyed to the public
डॉ. नातू म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. इंदिरा गांधींनंतर सलग 9 वर्ष पंतप्रधान राहीलेले नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. त्याचे सेलिब्रेशन न करता जनतेशी कम्युनिकेशन करत केंद्र सरकारने या कालावधीत राबवलेल्या योजना आणि घेतलेले निर्णय जनतेला सांगण्याचे काम भाजप कार्यकर्ते करणार आहेत. Plans of the center will be conveyed to the public


मोदींनी पंतप्रधान झाल्यावर जनधन योजना सुरु केली. कोरोना महामारीच्या काळात महिलांच्या खात्यात ५०० रुपये जमा केले. देशात प्रभावीपणे लसीकरण मोहिम राबवली. ग्रामीण भागातील आरोग्यकेंद्रांना बळकट करण्याचे काम केले. मुस्लीम महिलांवर अन्यायकारक तिहेरी तलाक पध्दत बंद केली. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणीला मान्यता दिली. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले. कौशल्य विकास योजनेतून अनेक रोजगार निर्माण केले. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे हमीभाव दिला शिवाय किसान सन्मान योजना प्रभावीपणे राबवली. उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा फुले योजना या योजनांमधुन सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. Plans of the center will be conveyed to the public


राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात मजबुत धोरण आखले. दहशतवादाचे कंबरडे मोडणारे दोन सर्जिकल स्ट्राईक केले. देशाच्या स्वातंत्र्यापासून प्रलंबित राहीलेले 370 कलम हटविणे, अयोध्येत राम मंदिर पूर्णत्वास नेण्याचे काम मोदी सरकारने केले. अत्यंत कमी वेळात नवे संसद भवन बांधले. भ्रष्टाचार संपविण्यासाठी नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. देशाच्या वेगवान प्रगतीसाठी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, गती योजना, निती आयोग, जीएसटी कर प्रणाली असे धोरणात्मक निर्णय घेतले. जगभरात भारताची प्रतिमा उंचावण्याचे काम मोदींनी केले. Plans of the center will be conveyed to the public


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच केंद्र सरकारमधील मंत्र्यांना आपला लोकसभा मतदारसंघ सोडून अन्य लोकसभा मतदारसंघात पाठवले. गेल्या चार वर्षात चार केंद्रीय मंत्र्यांचे कोकणात दौरे झाले. त्यामुळे इथल्या समस्या थेट केंद्र स्तरावर पोचण्यास मदत झाली. गेल्या 9 वर्षांच्या कालखंडातील ही सर्व कामे पुन्हा एकदा जनतेला सांगण्यासाठी संपूर्ण देशात भाजप जनसंपर्क अभियान राबवित आहे. गुहागर मतदार संघातील ३२५ बुथवर १५ ते ३० जून या कालावधीत मोदी सरकारने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकारचा नारा यशस्वी करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. Plans of the center will be conveyed to the public


या पत्रकार परिषदेला भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेडचे तालुकाध्यक्ष किशोर आब्रे, जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, महिला आघाडी प्रमुख रश्मी पालशेतकर, शहराध्यक्ष संगम मोरे, गटनेते उमेश भोसले, विजय मसुरकर, गजानन वेल्हाळ, शार्दुल भावे, आदी उपस्थित होते. Plans of the center will be conveyed to the public