मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; युतीमध्ये चांगला समन्वय आहे
मुंबई, ता. 16 : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दहा महिन्यांच्या या तणावाच्या परिस्थितीतून मुक्तता मिळाल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मंत्रिमंडळ विस्ताराकडे वळवला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे. Cabinet expansion ahead of monsoon session
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/05/add.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/05/add.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, आता सर्वात प्रथम प्राथमिकता म्हणजे पक्षविस्तार. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असताना माझ्या संपर्कात केवळ ठाकरे गटाचेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही अनेक नेते होते. पण त्यांना निकालाची धास्ती होती. आता ही धास्ती दूर झाली आहे. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. Cabinet expansion ahead of monsoon session