रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाअंतर्गत ही स्पर्धा २२ मे रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता ऐतिहासिक पतितपावन मंदिरात रांगोळी रेखाटण्यास सुरवात होणार असून सायंकाळी ६ वाजता या रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटासाठी होणार आहे. District Level Rangoli Competition
या स्पर्धेमध्ये स्वा. सावरकर यांच्या जीवन प्रसंगांवर रांगोळी काढायची आहे. रांगोळीचा आकार ४ फूट बाय ३ फूट आहे. प्रथम क्रमांकास रू. ५०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय रू. ३०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय रू. २०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीसे प्रत्येकी रू. १०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. District Level Rangoli Competition

रांगोळी काढण्यासाठी २२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ दिला जाणार आहे. रांगोळी चित्राचे स्केच करून आणायचे आहे, कृष्णधवल प्रिंटचा वापर करू नये. स्पर्धकांनी आपली नावे १८ मे पर्यंत सौ. अनघा निकम- मगदूम, मंगेश मोभारकर यांच्याकडे द्यावीत. स्पर्धकांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून बक्षीस वितरण २८ मे रोजी पतितपावन मंदिरात होणार आहे. जिल्ह्यातील रांगोळीकारांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टतर्फे केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सौ. अनघा निकम- मगदूम मो. 9422371907, मंगेश मोभारकर मो. 8766432864 यांच्याशी संपर्क साधावा. District Level Rangoli Competition
