मनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा सवाल
गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या तसेच आर्थिक उलाढाल होत असलेल्या आबलोली आणि शृंगारतळी या बाजारपेठेत औषधोपचारसाठी, खरेदीसाठी आजूबाजूच्या २० ते २५ गावातील लोकांची गर्दी होत असते. यावेळी खरेदीबाजार व इतर कामे उरकून गाडीची प्रतिक्षा करत येथील ग्रामस्थांना भर उन्हात ताटकळत, तर कधी कधी दुकानदारांच्या दुकानाचा सहारा घेऊन तासंनतास उभे रहावे लागते. सद्या कडाक्याचा उन्हाळा असल्यामूळे नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. हिच अवस्था पावसाळ्यातही भिजल्याने होणार असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी प्रशासनाने आबलोली आणि शृंगारतळी बाजारपेठेत पिकअप शेड बांधावी अशी आग्रही मागणी मनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे. Demand for ST stop at Aabaloli and Shringartali

गुहागर तालुक्यातील बहुतांश सर्वच गावे ही या बाजारपेठांवर अवलंबून आहेत. नेहमी हजारो लोकं या दोन शहरात विविध कामांसाठी ये-जा करत असतात. तरी देखील या दोन्ही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पीकअप शेडची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना भर उन्हात व पावसात तासंनतास उभं राहून बसची प्रतिक्षा करावी लागते. शेड नसल्याने रस्त्यावर गर्दी होते. अपघातही होतात.

आबलोली एस.टी. स्टॅण्डवर कोणीतरी पत्रा टाकला आहे. पण त्यावर काही नमूद नसल्याने ती जागा दुकानदाराची की सरकारी यावर लोकांचा संभ्रम आहे. त्यामुळे प्रवाशी उन्हात उभं राहणे पसंत करतात. तरी प्रशासनाने याबाबत लक्ष घालून आबलोली एसटी थांबा असं नमूद करावं. तसेच शृंगारतळी बाजारपेठतील प्रश्नहि ताबडतोब सोडवावा, अशी आग्रही मागणी गणेश कदम यांनी केली आहे. Demand for ST stop at Aabaloli and Shringartali
