गुहागर, ता. 22 : देशाच्या स्वातंत्र्याचा एकीकडे अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी दुसरीकडे मात्र अजूनही देशातील खेडेगावांचा विकास हा झालेलाच नाही. अशाचप्रकारे बुरोंडी बंदरात जेटी बांधण्यात आली नसल्या कारणाने मासेमारांचे जेटीविना हालच हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र शासन नुसतेच जाहीरातबाजी करून विकासाचे आभास दाखवते आहे हे यावरून स्पष्ट झालेले आहे. Disadvantage of fishermen in Burondi port
दापोली तालूक्यातील बुरोंडी बंदरात मासेमार व्यवसायिकांकडून केंद्र शासनाकडे सातत्याने बुरोंडी बंदरात जेटी उभारण्याची गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ करण्यात येत असलेली मागणी केंद्र शासनाला अजूनही पुर्ण करता आलेली नाही. त्यामुळे समुद्रातून पागून आणलेली मासळी किनाऱ्यावर आणताना मच्छिमांराची चांगलीच दमछाक होत आहे. शिवाय मासेमारी करण्यासाठी किनाऱ्यावरील बोटी समुद्रात नेताना मासेमारांना खुपच कष्ट उपसावे लागत आहेत. Disadvantage of fishermen in Burondi port

दापोली तालूक्यातील बुरोंडी बंदर हे एक ऐतिहासिक बंदर तर आहेच. शिवाय या बंदराची ओळख प्रामुख्याने ताज्या आणि स्वस्त मासळी मिळण्याचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात मासळी खरेदीसाठी दापोली शहर आणि तालूक्यातील अन्य भागातून हॉटेल व्यवसायिकांसह खवय्यांची गर्दी येथे असते. बुरोंडी हे मासेमारीचे बंदर असतानाही इतके वर्ष झाले तरी येथे मासळी मार्केट नाही. त्यामुळे मासळी खरेदीसाठी येणाऱ्यांना बुरोंडी येथील बंदरावरच जावून मासळी खरेदी करावी लागते. मासेमार हे समुद्रातून पागुन आणत असलेली मासळी होडयांमधून समुद्र किनाऱ्यावर कसरत करत आणावी लागते. तरीही याकडे एक गंभीर समस्या म्हणून ना प्रशासनातील अधिकारी बघत ना केंद्र शासनाकडून पाहीले जात. त्यामुळे येथील मासेमारांची जेटीची समस्या ही अजूनही कागदावरच आहे. Disadvantage of fishermen in Burondi port
बुरोंडी बंदर किनारी भाग हा बहुतांशी मच्छिमारी बांधवांच्या वस्तीचा आहे. येथील रहीवाशांचे उपजीविकेचे प्रमुख साधन मासेमारी आहे. बुरोंडी गावातील रहीवाशांच्या शासनाच्या फिशरीज परवाना अधिकारी दाभोळ येथील कार्यालयात 256 बोटी नोंदणीकृत परवानाधारक आहेत. तर छोटया लहान होडयांची डिंग्यांची परवानगी नसते अशा अनेक होडया आहेत या बोटी तसेच होडया लावण्यासाठी बंदरावर जेटीची सोय नसल्याने साधारणपणे समुद्रात तीनशे मिटर अंतरावर पाण्यात बोटी उभ्या करून लहान (होडया) डिंग्याच्या सहाय्याने पागलेली मासळी किना-यापर्यंत आणावी लागते.कधी कंबरेभर पाण्यातून तर कधी खांदयाचा वापर करत कधी होडींच्या उलडीला खांदा देत किना-यावर यावे लागते. ही सारी मासेमारांची मरण यातना कधी संपुष्टात येणार याच्याच प्रतिक्षेत बुरोंडीतील मच्छिमार बांधव आहेत. Disadvantage of fishermen in Burondi port
समुद्रात दुरवर नांगरून ठेवलेल्या बोटी फिशींगला समुद्रात लोटण्यापूर्वी मासेमारीस जाणाऱ्या बोटींमध्ये चार दिवसाची लागणारी सामुग्री जसे पाणी, डिझेलसाठा, जाळी, खाण्याच्या वस्तू आदी समुद्रात बोटींपर्यत न्याव्या लागतात. या सर्व डिंग्या अथवा लहान होडयांमधून त्या बोटीपर्यंत न्याव्या लागतात. यात मासेमारांच्या वेळेसह आर्थिक नुकसानही होते. त्यात बोटींच्या दुरूस्तीची डागडूजी करावयाची असेल तर आणखीनच त्रासाचे होते. मच्छिमार दर्यावर्दी लोकांच्या जेटीसारख्या महत्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनासह केंद्र शासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे अजून कितीकाळ वाट पाहील्यानंतर बुरोंडी जेटीचा प्रश्न निकाली निघणार असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. Disadvantage of fishermen in Burondi port
