गुहागर, ता. 13 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळूकमध्ये माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेला ग्रामस्थ सहकार्य करत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत प्रशासन, शिक्षण व आरोग्य विभागाची 3 पथके या अभियानासाठी तयार करण्यात आली आहेत. कोतळूकमधील 794 कुटुंबांची तपासणी ही पथके करत आहेत. Kotluk Villagers response to My Ratnagiri My Responsibility campaign. 3 squads have been formed for this campaign. The teams are investigating 2665 villagers from 794 families.
गुहागर तालुक्यात कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या गावांमध्ये कोतळुक गावाचा समावेश आहे. कोरोना रोगाने या गावात एक एक वाडी आपले लक्ष्य बनविली होती. मात्र त्यावेळीही ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामकृतीदल, आरोग्य विभाग यांनी योग्य नियंत्रण ठेवत रूग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आता माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या उपक्रमात गावातील सुमारे ७९४ कुटुंबातील २६६५ ग्रामस्थांपर्यंत पोचण्याचे काम ३ पथके करत आहेत.
या पथकांमध्ये उपसरपंच संजीवनी जावळे, ग्रामपंचायत सदस्य विजय भेकरे, रमेश गोरिवले, शितल गोरिवले, संचिता गुरव, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, तलाठी सुशिलकुमार परिहार, पोलिस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, आशा सेविका नेत्रा आरेकर, रश्मी काताळकर, प्राजक्ता गुरव, श्रद्धा कावणकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर, कोतवाल अमित आरेकर, शिक्षक माधुरी पाटील, महेश सुर्वे, निलम जगताप, उमेश चाफे, सुकन्या पावरी, मानसी उकार्डे, संस्कृती ढवळ, संध्या नेटके, रेणुका मत्याणे यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाचे श्रीमती शेळके, निलेश आढाव आरोग्य विषयक माहिती, तपासणी, भेटी देऊन सहकार्य करत आहेत.
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या अभियानातील पथके प्रत्येक घरात जावून ऑक्सिमिटरद्वारे ऑक्सिजनचे शरिरातील प्रमाण तपासणे, थर्मल गनच्या माध्यमातून शरिराचे तापमान तपासणे, कोणाला सर्दी, खोकला, अंगदुखी, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, जुलाब, उलटी अशी लक्षणे आढळणारी व्यक्ती कुटुंबात आहे याचा शोध घेण्याचे काम करत आहेत. असे ग्रामस्थ आढळल्यास त्यांना आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. तसेच लोकांमध्ये लसीकरणाबाबत असणारा गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाची भिती न बाळगता लक्षणे दिसले कि लगेच न घाबरता आरोग्य विभागाकडून तपासणी केल्यानंतर पॉझिटिव्ह रूग्णांनी कशाप्रकारे काळजी घ्यावयाची, गृह विलगिकरणात असल्यावर काय केले पाहिजे, कोरोना विषयी असणारे समज, गैरसमज, ग्रामस्थांनी दैनंदिन कामकाज करताना कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे अशा अनेक गोष्टींबाबत ग्रामस्थांची जागृती करण्यात येत आहे.
Kotluk Villagers response to My Ratnagiri My Responsibility campaign
दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.