भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी तर्फे आयोजन; ३५० जणांचा सहभाग
रत्नागिरी, ता. 31 : देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीदिनी भारतीय तटरक्षक वायु अवस्थान आयोजित ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘Run for Unity’ for India’s Unity


‘रन फॉर युनिटी’ ची सुरुवात सकाळी ६.३० वाजता मारुती मंदिर येथून झाली. भारतीय तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी चे कामांडट विकास त्रिपाठी यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर मारुती मंदिर येथून सुरवात होऊन भारतीय तटरक्षक वायु अवस्थानच्या कार्यालयात या उपक्रमाची सांगता झाली. ‘Run for Unity’ for India’s Unity


या उपक्रमात पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण रेल्वे, गद्रे मरीन लिमिटेड, एमईएस, नवनिमार्ण विद्यालयाचे विद्यार्थी, आयकेआरए इंग्लिश मिडीयम स्कूल, कस्टम विभाग, फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोराशन, मराठा बिल्डर्स, आरपीफ, अरिहंत ग्रुप यांच्या कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांसह सुमारे ३५० पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. ‘Run for Unity’ for India’s Unity