निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ
गुहागर, ता. 21 : प्रचंड गरिबीतूनही वाचनाच्या आवडीतून अब्दुल कलाम एक थोर शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनले सर्वांनीच वाचत राहिल्यास जीवन जगण्याची सकारात्मक प्रेरणा मिळेल असे उद्गार ज्ञानरश्मी ग्रंथालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी काढले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त ज्ञानरश्मी ग्रंथालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी ते बोलत होते. Reading Inspiration Day at Gnanarashmi Library

यावेळी आरेकर म्हणाले की, शासनाचे गाव तिथे ग्रंथालय ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही फक्त वाचन दिनानिमित्त वाचन न करता ही रोजची सवय लावून घेतली पाहिजे, असे आवाहन आरेकर यांनी केले. वंदना माने म्हणाल्या की, भारत महासत्ता बनेल याचे भाकीत अब्दुल कलाम यांनी केले व यासाठी त्यांनी कायम तरुणांना प्रोत्साहित केले. यावेळी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे दत्तात्रय गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ग्रंथालयाच्या सचिव प्राध्यापिका मनाली बावधनकर यांनी संपूर्ण सूत्रसंचालना बरोबरच विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेतून सहभाग घेताना कोणती तयारी करावी होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात याचे मार्गदर्शन केले. Reading Inspiration Day at Gnanarashmi Library

या निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम कार्तिकी सुनील भोसले द्वितीय पूर्वी रुपेश बागकर तृतीय संस्कार समीर जांगळी व मोठ्या गटात प्रथम आर्या मंदार गोयथळे द्वितीय जीया कोलकांड तृतीय सान्वी संकेत गोयथळे यांनी यश मिळविले. त्यांना चषक देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, प्रभुनाथ देवळेकर, कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर, सोनाली घाडे, आधी उपस्थित होते. Reading Inspiration Day at Gnanarashmi Library
