रत्नागिरी, ता. 24 : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महसूल विभागाने प्रभाग रचनेचा महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोकण विभागीय आयुक्तांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील शेकडो ग्रामपंचायतींच्या प्रारुप प्रभाग रचनेला अधिकृत मान्यता दिली असून, यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. Gram Panchayat Elections
निवडणुकीचे नियोजन आणि व्याप्ती ही प्रभाग रचना प्रामुख्याने जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी केली जात आहे. यामध्ये नवीन प्रभाग पाडणे, सदस्य संख्या निश्चित करणे आणि आरक्षणाचे प्रारूप ठरवणे या प्रक्रियेचा समावेश आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत की, ७ एप्रिल २०२६ पर्यंत या प्रभाग रचनेची ’नमुना ब’ अधिसूचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवण्यात याव्यात. Gram Panchayat Elections

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची सविस्तर यादी:- मंडणगड तालुक्यामध्ये १५ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. दापोली तालुक्यातील सर्वाधिक ५८ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होणार आहे. खेडमधील एकूण ८७ ग्रामपंचायतींची प्रक्रिया पार पडेल. चिपळूण येथील ८१ गावांचा समावेश आहे. गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेत समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना होईल. २३ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राजापूरमधील ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. Gram Panchayat Elections
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ७ एप्रिल रोजी जाहीर होणार्या प्रारूप प्रभाग रचनेवर आपल्या हरकती योग्य पुराव्यासह नोंदवाव्यात. त्यानंतर जिल्हाधिकारी या हरकतींवर सुनावणी घेऊन २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचा प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करतील. Gram Panchayat Elections
