बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांची सरकारकडे मागणी
गुहागर, ता. 29 : कोकणसह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून कोकणातील मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन पेरणी पूर्व कामाचे काळात अवकाळी अतिवृष्टी झाल्याने भाजवणी केलेली शेतीचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. प्रति गुंठा सहा ते सात हजार रुपये सर्वसामान्य शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई मिळावी, अशी आग्रही मागणी बळीराज सेनेच्या वतीने रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे केली आहे. Farmers should get compensation


निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील शेतकरी पावसाळ्यापुर्वी शेतीची मशागत करतात भाजवणी साठी आर्थिक ताण पडतो. भाजवण झाल्यावर रोहिणी नक्षत्र मध्ये पेरणी होते. मात्र मान्सून येण्या आधीच कोकण भागात मुसळधार पावसाने भाजवण केलेली शेती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरासरी पहाणी करून पंचनामे करून सरकारने प्रति गुंठा सहा हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराज सेना जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुकासचिव ॲड. दिनेश कदम व सर्व कार्यकारणी सदस्य यांनी केली आहे. Farmers should get compensation

