आमदार भास्कर जाधव; तौक्ते वादळातील नुकसानीचा घेतला आढावा
गुहागर, ता. 19 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार की निसर्ग वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार हे अजुनही नक्की व्हायचे आहे. मात्र बाधित जनतेचा सहानभुतीपूर्वक विचार करुन आपण पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त त्यातून सुटता कामा नये. याची काळजी प्रशासनाने घ्याची. असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते गुहागर पंचायत समितीच्या तौक्ते वादळ नुकसान आढावा बैठकीत बोलत होते.
गुहागर तालुक्यात 134 घरे, 3 गोठे, जिल्हा परिषद शाळांचे 3 रंगमंच, 2 ग्रामपंचायत इमारत, 2 सार्वजनिक शौचालये, 2 स्मशानभूमी यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक कृषी पंप वाहून गेला आहे. 4 गुरे दगावली आहेत. 1 मच्छीमार बोट, 1 गांडुळखताचा प्रकल्प यांचेही नुकसान झाले आहे.
तालुक्यातील 56 हेक्टर क्षेत्रात 225 शेतकऱ्यांच्या बागेत आंबा गळून पडला आहे. 8 हेक्टर क्षेत्रातील 45 शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याची झाडे उन्मळून पडलेली आहेत. 94 शेतकऱ्यांच्या 17 हेक्टर क्षेत्रातील काजू पिकाचे नुकसान झाले आहे. तर 30 शेतकऱ्याच्या नारळ, सुपारी बागांचे नुकसान झाले आहे. असे 84.5 हेक्टरमधील 394 शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने आजच्या बैठकीत दिला.
तौक्ते वादळात महावितरणचे 150 उच्चदाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब आणि 350 लघुदाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे 17400 ग्राहकांचा वीज पुरवठा आजही खंडीत आहे. पालशेत, आबलोली आणि गुहागर शाखा कार्यालय क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अशी माहिती रानवीच्या शाखा अभियंत्यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार जाधव म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली गेली तर अंशत: नुकसानीपोटी एका घराला 5 हजार रुपये मिळतात. पण निसर्ग वादळातील निकष महाराष्ट्र शासनाने लावले तर त्याच घराला 15 हजाराची नुकसानभरपाई मिळेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये बैल, म्हैस दगावले तर 35 हजारापर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतुद आहे. कृषी विभागाने पंचनामे करताना वादळात पिळवटून गेलेल्या झाडांचाही विचार करावा. शासन कोणते निकष लावेल हे आज सांगू शकत नाही. मात्र नुकसानभरपाईचे पंचनामे कसे केले तर जनतेला अधिक भरपाई मिळेल हे आपण शोधुन काढले पाहिजे. त्यानुसार पंचनामे करावेत. जेणेकरुन बाधितांना योग्य मोबदला आपण देवू शकु. महावितरणचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले आहे. 450 वीजेचे खांब उभे करण्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणाहून कंत्राटदारांच्या टीम बोलवाव्या लागतील. यासंदर्भात मी स्वत: कार्यकारी अभियंत्यांजवळ बोलतो. लवकरात लवकर तालुक्यातील जनतेला वीज मिळण्यासाठी आपण प्रयत्न करु या.
या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, जि.प. सदस्य प्रविण ओक, सौ. नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
Whether the compensation will be as per the National Disaster Management Act or whether the Maharashtra government will impose criteria like a natural storm is yet to be ascertained. But we should conduct panchnama with sympathetic consideration of the affected people. No one should be harmed. The administration should take care of this. This appeal was made by MLA Bhaskar Jadhav. He was speaking at a storm damage review meeting of Guhagar Panchayat Samiti.
In Guhagar taluka 134 houses, 3 cowsheds, 3 theaters of Zilla Parishad schools, 2 Gram Panchayat buildings, 2 public toilets, 2 cemeteries have been partially damaged. An agricultural pump has been carried. 4 cattle are slaughtered. 1 fishing boat, 1 vermicomposting project have also been damaged.
Mango has fallen in the orchards of 225 farmers in an area of 56 hectares in the taluka. The mango trees in the orchards of 45 farmers in an area of 8 hectares have been uprooted. The cashew crop in an area of 17 hectares of 94 farmers has been damaged. Coconut and betel nut orchards of 30 farmers have been damaged. The Department of Agriculture gave a preliminary report on the loss of 394 farmers in 84.5 hectares.
MSEDCL's 150 high voltage power lines and 350 low voltage power lines have been destroyed in the storm. As a result, power supply to 17,400 customers is still cut off. The worst affected areas are Palshet, Abloli and Guhagar branch offices. This information was given by Ranvi's branch engineers.