राष्ट्र सेविका समिती, रेणुका प्रतिष्ठानचे आयोजन; निकाल जाहीर
रत्नागिरी : राष्ट्र सेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठानने भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या कथा स्पर्धेत अर्णव मकरंद पटवर्धन याला सर्वोत्कृष्ट बक्षीस मिळाले. तसेच प्रथम क्रमांक भार्गवी विवेक केळकर, द्वितीय क्रमांक अर्थ आनंद पारखी, तृतीय क्रमांक मनवा हृषिकेश जोशी यांनी यश मिळवले.
Arnav Makrand Patwardhan won the best prize in the Story Telling Competition. This Competition organized by Rashtra Sevika Samiti and Renuka Pratishthan on the occasion of Indian Independence Day. Also first place went to Bhargavi Vivek Kelkar, second place to Artha Anand Parkhi, third place to Manava Hrishikesh Joshi.
राष्ट्र सेविका समितीतर्फे दर शनिवारी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत ऑनलाइन संस्कार वर्ग चालवला जातो. यामध्ये रत्नागिरीसह देशातील विविध ठिकाणचे शालेय विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांची कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. याचा निकाल स्वातंत्र्यदिनी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण सौ. मीरा भिडे, सौ. अर्चना फाटक यांनी केले. संस्कार वर्गाचे नियोजन सुनेत्रा जोशी व विशाखा सोमण करत आहेत. त्यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक पोस्टाने पाठविण्यात येणार आहेत.


स्पर्धेचा निकाल असा-
सर्वोत्कृष्ट- अर्णव पटवर्धन (परशुरामपंत अभ्यंकर प्राथ. विद्यामंदिर, रत्नागिरी),
प्रथम- भार्गवी केळकर (पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी),
द्वितीय- अर्थ पारखी (सें. मॉंटफोर्ट स्कूल, भोपाळ),
तृतीय- मनवा जोशी (एम. एन. जोशी इंग्लिश मिडीयम स्कूल रत्नागिरी),
उत्तेजनार्थ-
वैष्णवी भागवत (युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण),
आरिषा यदमळ (रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड),
निधेय ढोले (सेंट थॉमस स्कूल, रत्नागिरी),
वेद गोगटे (श्री. मो. गोगटे विद्यालय, जामसंडे, सिंधुदुर्ग).
कौतुकास्पद-
प्रिशा यदमळ (रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड),
श्रीराम देव (किडझी प्री स्कूल),
राघव पटवर्धन (दामले विद्यालय, रत्नागिरी).