उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील 7 तालुक्याध्यक्षांची निवड पूर्ण
गुहागर, ता. 20 : (Abhy Bhatkar BJP Taluka President) विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आज गुहागर तालुक्यासह उत्तर रत्नागिरीतील 7 तालुकाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली. उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष असलेले अभय भाटकर यांची गुहागर तालुका भाजपा अध्यक्षपदी निवड झाली. यावेळी निवडणूक अधिकारी प्रशांत शिरगांवकर आणि पक्ष निरिक्षक म्हणून सौ. निलम गोंधळी हे दोन प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपची निवड प्रक्रिया
वभाजप या राष्ट्रीय पक्षात तालुकाध्यक्षांची प्रथम निवड केली जाते. या निवडीनंतर जिल्हा, प्रदेश आणि सर्वांत शेवटी राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाते. तालुकाध्यक्षांच्या निवडीसाठी उत्तर रत्नागिरी जिल्हात निवडणूक अधिकारी म्हणून प्रशांत शिरगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोणत्याही तालुक्याध्यक्षांची निवड करण्यापूर्वी तालुका पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, संबंधित तालुक्याती प्रदेश व त्यावरी स्तरावरचे पदाधिकारी यांनी तीन नावांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवायची होती. निवडणुक अधिकाऱ्यांनी निवड प्रक्रियेसाठी बोलावलेल्या सभेमध्ये संबंधित तालुक्यातील सर्व सभासदांसमोर या तीन नावांचे वाचन करुन यापैकी एकाची निवड तालुकाध्यक्ष पदी करायची होती. आवश्यकता भासल्यास मतदान घेण्याचे अधिकारही निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
Abhy Bhatkar BJP Taluka President
गुहागर तालुक्यातून सध्याचे अध्यक्ष निलेश सुर्वे, मंगेश रांगळे आणि अभय भाटकर या तिघांची नावे प्रदेश BJPला प्राप्त झाली होती. भाजपमध्ये साधारणपणे एकदा कालावधी संपल्यानंतर त्या कार्यकर्त्याला त्या पदावर रहात येत नाही. यापैकी निलेश सुर्वे हे अपरिहार्य कारणांमुळे सलग दोन वेळा (5 वर्ष) तालुकाध्यक्ष राहीले होते. त्यामुळे निलेश सुर्वे यांनी तालुकाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. उर्वरित दोन नावांवर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेतून अभय भाटकर यांचे नाव तालुकाध्यक्ष पदासाठी पुढे आले. मंगेश रांगळे यांनी अभय भाटकर यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे पक्ष निरीक्षक सौ. निलम गोंधळी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत शिरगांवकर यांनी अभय भाटकर यांची तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
आक्रमक नेता अभय
अभय भाटकर यापूर्वीही तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी शक्तीप्रदर्शन करुनही निलेश सुर्वे यांच्या गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडली. त्यानंतर अभय भाटकर यांनी वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटात लक्ष केंद्रीत करत जिल्हा परिषदची उमेदवारी मिळावी म्हणून तयारी केली. मात्र आयत्यावेळी डॉ. विनय नातूंनी त्यांच्या पत्ता कट केला आणि संतोष जैतापकर यांना उमेदवारी दिली. दोन वेळा नाव कापल्याने नाराज झालेल्या अभय भाटकर यांनी सक्रीय राजकारणातून बाजूला होणे पसंत केले. मात्र याच दरम्यान झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या नेतृत्त्वाची चुणूक पक्षाला दाखवून दिली. जवळपास 3 वर्ष तालुकास्तरावरील राजकारणापासून दूर असलेले अभय भाटकर 2025 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षासाठी काम केले पाहीजे या हेतूने पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. आपल्या नेतृत्त्वाची झलक त्यांनी याही निवडणुकीत दाखवून दिली. डॉ. विनय नातूंचे विरोधक अशी जनमानसात झालेली प्रतिमा मोडून काढत डॉ.नातुंसह सर्व पदाधिकाऱ्यांबरोबर सलोखा राखत आपण कोणत्याही गटाचे नाही तर भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत हे ही त्यांनी दाखवून दिले. जिल्हास्तरावर काम करु लागलेल्या अभय भाटकर यांना आता तालुकास्तावरील कोणत्याही पदाची अभिलाषा नव्हती. मात्र भाजपच्या निवड प्रक्रियेत अभय भाटकर यांचे नाव पदाधिकाऱ्यांनी निवडले होते. तसेच आज पदाधिकाऱ्यांनीही बिनशर्त अभय भाटकर यांच्या नावाला पाठिंबा दिला. म्हणून गुहागर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपे कार्यकर्ते निवडून आले पाहीजेत यासाठी मेहनत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. Abhy Bhatkar BJP Taluka President
या निवड प्रक्रियेचे वेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, श्रीकांत महाजन, तालुका सरचिटणीस सचिन ओक, रविंद्र अवेरे, तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, संदिप साळवी, अरूण गांधी, मंगेश जोशी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, प्रांजल कचरेकर, स्मिता जांगळी, श्रद्धा घाडे, विश्वास बेलवलकर, साईनाथ कळझुणकर, आशिष विचारे, संदिप कोंडविलकर, मुबीन ठाकुर, नरेश पवार, विनायक लांजेकर, इक्बाल पंछी, नाना वराडकर, मुन्ना जैतपाल यांच्यासह भाजपाचे बहुसंख्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तर रत्नागिरीतील निवड प्रक्रिया पूर्ण
यावेळी बोलताना प्रशांत शिरगांवकर यांनी सांगितले की माझ्याकडे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांच्या निवडची जबाबदारी होती. आज सर्व तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुहागर मध्ये अभय भाटकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. त्याचप्रमाणे गुहागर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चिपळूण पश्चिम या तालुक्याच्या अध्यक्ष पदी दहिवलीतील उदय घाग यांची निवड करण्यात आली. गुहागर विधानसभेत येणाऱ्या खेड दक्षिण तालुकाध्यक्ष पदी विनोद चाळके यांची निवड करण्यात आली आहे. खेड उत्तर तालुक्यात आधी अध्यक्ष असलेल्या ऋषिकेश मोरे यांची, दापोली शहर तालुकाध्यक्ष म्हणून जया साळवी यांची तर मंडणगड तालुकाध्यक्ष म्हणून प्रविण कदम यांनी निवड करण्यात आली आहे. Abhy Bhatkar BJP Taluka President
माजी आमदार विनय नातूंची अनुपस्थिती
माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष, या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे विधानसभा समन्वयक अशा विविध पदांवर काम करणारे डॉ. विनय नातू या निवडीच्या वेळी भाजप कार्यालयात नव्हते. 2009 मध्ये अपक्ष निवडणुक लढल्यानंतर झालेल्या भाजप तालुकाध्यक्षांच्या निवडी प्रक्रियेपासून डॉ. विनय नातूंनी दूर होते. आज पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत इच्छुक असूनही जागावाटपात ही जागा शिवसेनेला गेल्यामुले निवडणूक लढविता न आलेले डॉ. नातू गुहागर तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीपासून दूर राहीले.