साठाव्या संगीत राज्यनाट्य स्पर्धेत ‘कट्यार काळजात घुसली’ नाटक तृतीय
गुहागर, ता. 01 : रत्नागिरीत साठाव्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सादर केलेल्या कै. पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित सं. कट्यार काळजात घुसली या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. आतापर्यंत या मंडळाने संगीत राज्य नाट्य स्पर्धेत तीन नाटके सादर करून दोन बक्षीसे मिळवली आहेत. युवा, नवोदित, गुणी कलाकारांमुळे नाटकाला यश मिळाले असून यापुढेही अशीच घोडदौड करायची आहे, असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


अनुभवाचा फायदा संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाला झाला. नवोदित गायकांच्या अभिनयानेही नाटक रंगले. नवी संस्था, नवीन तरुण कलाकारांनी केलेली ही प्रगतीची सुरवात आहे. कलाकाराने नम्रपणाने कलासक्त राहिले, उत्तम करण्यासाठीचा सतत शिकण्याचा ध्यास घेतला तरच नटेश्वराच्या कृपेने यशाचा आनंद मिळू शकतो, असे प्रतिपादन या नाटकाचे दिग्दर्शक वामन उर्फ राजाभाऊ जोग यांनी केले. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


स्वातंत्र्यपूर्व संस्थानच्या कालखंडातले ही कथा पं. भानुशंकर आणि उस्ताद आफताब हुसेन यांच्या स्वतंत्र्य गायनशैलीतील संघर्ष हा या नाटकाचा मुख्य गाभा. त्या संघर्षामध्ये भरडला गेलेला कलासक्त सदाशिव. संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारखा अलौकिक प्रतिभा लाभलेल्या उस्ताद खॉंसाहेब आणि दारव्हेकरांची ओघवती लेखनशैली यामुळे ही नाट्यकृती रसिकांच्या हृदयात अढळ स्थानावर आहे. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


जोग म्हणाले की, मी नोकरीनिमित्त रायगड, ठाणे येथे ३५ वर्षांहून अधिक काळ व्यतीत केला. मुंबई जवळ असल्याने लहानपणापासून असणाऱ्या नाट्यकलेला खूपच वाव मिळाला. १९८१ ते २०१४ पर्यंत विविध स्पर्धात्मक नाट्यकृती, एकपात्री अभिनंय, व्हॉईस ओव्हर, आकाशवाणी, सुमारे ३० दूरदर्शन मालिका, ३ मराठी चित्रपट, व्यावसायिक रंगभूमीचा अनुभव यातून माझ्यातल्या कलाकाराला समाधानकारक वाव मिळाला. १९९४ पासून मी नाट्य दिग्दर्शनाकडे वळलो. स्पर्धात्मक रंगभूमीवर ३३ पेक्षा जास्त पारितोषिके मिळाली. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


२०१६ ला सेवानिवृत्तीनंतर रत्नागिरीला मूळगावी स्थायिक झालो. सन २०१७ अखेरीस श्रीनिवास जोशी आणि कै. चंद्रशेखर जोशी यांच्या प्रेमळ आग्रहाखातर अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या संस्थेचे प्रथमच सं. मानापमान या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली. नाट्यसंस्था नवीन, सिद्धी बोंद्रे आणि प्रवीण शिलकर वगळता अन्य नवख्या कलाकारांना घेऊन सं. मानापमानने राज्यात पदार्पणातच द्वितीय क्रमांक पटकावला. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


सन २०१९ मध्ये काही उदयोन्मुख हौशी कलाकारांना घेऊन सं. संशयकल्लोळ या नाट्यकृतीला दोन रौप्य पदकांनी कमाई करता आली. सन २०२० मध्ये सं. कट्यार काळजात घुसली ही नाट्यकृती फारशी चमक दाखवू शकली नाही. नंतर २०२०-२१ चा कोरोना काळ सर्वच थांबवून गेला. पण अत्यंत मेहनती कलाकारांचे परिश्रमाचे चीज व्हावे म्हणून असणाऱ्या त्रुटी दूर करून थोडेफार फेरबदल करून २०२२ मध्ये पुन्हा नव्या जोमाने जिद्दीने सं. कट्यारचा प्रयोग स्पर्धेत सादर केला आणि तृतीय क्रमांक मिळाला. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


या नाटकात संतोष दामले, अनंत आगाशे, सौ. पौर्णिमा साठे, स्वानंद देसाई, मनाली जोशी, कौस्तुभ सरदेसाई, साईश प्रभुदेसाई, पूर्वा जोगळेकर, मुक्ता जोशी, आदित्य लिमये, सूर्याक्ष रेमणे, अनिकेत आपटे, श्रीधर पाटणकर, सायली मुळ्ये, सिद्धी बोंद्रे, प्रवीण शिलकर, स्वानंद भुसारी, संगीत मार्गदर्शक विलास हर्षे, संध्या सुर्वे, राम तांबे, ऑर्गनवादक संतोष आठवले, वैभव फणसळकर आणि तबलावादक निखिल रानडे यांचे योगदानही मोलाचे आहे. Third prize to Chitpavan Brahmin Mandal


नाट्यसंस्थेचे श्रीनिवास जोशी, राजेंद्र पटवर्धन यांचा सहभाग शब्दांपलिकडचा आहे. मनोहर जोशी आणि खल्वायन संस्था तसेच मित्रप्रेमापोटी अविनाश काळे, गणेश जोशी खंबीरपणे उभे राहिले. नेपथ्यकार कै. दादा लोगडे यांचा मुलगा प्रसाद लोगडे, रंगभूषाकार रामदास मोरे, प्रकाशयोजना मंगेश लाकडे, अमेय धोपटकर, कै. गोपी भुवड, श्रवण सनगरे, सुयश जोशी, अर्चना जोशी, प्राजक्ता जोशी, शमिका जोशी, मुक्ता जोशी, कौस्तुभ जोशी या रंगकर्मींनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे नाट्यप्रयोग रंगत गेले. Third prize to Chitpavan Brahmin Mandal

