पालशेत ग्रामपंचायत : उपसरपंचांना पत्राबाबत माहिती नाही, सरपंच म्हणतात माझा अधिकार
गुहागर, ता. 16 : पालशेत ग्रामपंचायतीच्या एका पत्रावर ग्रामस्थ नाराज आहेत. हे पत्र लिहिताना किमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्र्वासात घ्यायला हवे होते. असे उपसरपंच महेश वेल्हाळ यांचे म्हणणे आहे. तर माझ्या अधिकार असल्याचे सरपंच सौ. संपदा चव्हाण यांनी सांगितले आहे.
The villagers are angry over a letter from the Palshet Gram Panchayat. At least the Deputy Sarpanch and gram panchayat members should have been trusted in writing this letter. This is the opinion of Deputy Panch Mahesh Velhal. But Sarpanch Mrs. Sampada Chavan said, I have the right to write the letter public interest issues.
सार्वजनिक बांधकाम विभागाने 13 जुलैला पालशेत बाजारपुल वहातुकीस बंद करत असल्याचे पत्र तालुका प्रशासनानला दिले. त्यानंतर भर पावसात आमदार जाधव यांनी पालशेत पुलाची पहाणी केली. सार्वजनिक बांधकामच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही. असे जाहीर केले. त्यामुळे आमदारांच्या भेटी नंतर किमान एकेरी वहातूक सुरु राहील. ही पालशेतवासीयांची अपेक्षाही फोल ठरली. त्यामुळे पालशेतमधील ग्रामस्थ सध्या बांधकाम विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराज आहेत.
त्यातच ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाला आणि आमदारांना लिहिलेले पत्रही समोर आले आहे. या पत्राखाली फक्त पालशेत ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संपदा चव्हाण यांची सही आहे. या पत्रात म्हटले आहे की, पालशेत बाजारपुल नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे वहातुक व ग्रामस्थांना ये जा करणे सुध्दा धोकादायक झाले आहे. तसेच पूलाची उंची कमी असल्याने पावसामध्ये पूलावरुन नेहमी पाणी जात असते. त्यामुळे पुढील सर्व गावांचा संपर्क तुटतो. तरी नादुरुस्त असलेला पूल दुरुस्त करुन ग्रामस्थ व वाहतूकीची गैरसोय दूर करावी.
या पत्राची चर्चा सध्या पालशेतमध्ये सुरु आहे. पालशेतच्या बाजारपुल धोकादायक ठरविण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे का. ग्रामपंचायतीने या पुलाचा सर्व्हे केला होता का. असे प्रश्र्न पालशेतमधील ग्रामस्थ विचारत आहेत.
या पत्राबाबत उपसरपंच महेश वेल्हाळ यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ते म्हणाले की सदर पत्र लिहिण्यापूर्वी सरपंच सौ. संपदा चव्हाण यांनी कोणतीही मिटींग घेतली नाही. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली नाही. उपसरपंच या नात्याने किमान मला माहिती देणे आवश्यक होते. मात्र आम्हाला सर्वांना अंधारात ठेवून हा पत्रव्यवहार सरपंचांनी केला आहे. काहीही न कळवता परस्पर पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
तर पालशेत ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संपदा चव्हाण म्हणाल्या की, ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांना या पत्रासंदर्भातील माहिती होती. प्रत्येक गोष्टीसाठी मिटींग बोलावणे शक्य नाही. त्यामुळे लोकहितासाठी सरपंचांच्या अधिकारात हे पत्र मी लिहिले आहे.