गुहागर, ता. 24 : आरे-वाकी-पिंपळवट ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महावितरण कंपनीमार्फत सुरू असलेल्या अंडरग्राऊंड केबलच्या कामात गंभीर अनियमितता व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत सरपंच समित घाणेकर यांनी आज बुधवारी गुहागर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. Sarpanch’s hunger strike against cable work
याबाबतचे निवेदन उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी उपविभाग गुहागर यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रस्त्यांची खोदाई करताना ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच रानवी ते बाजीप्रभु रोडवरील अंडरग्राऊंड केबलच्या कामात अंदाजपत्रकानुसार काम झालेले दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. Sarpanch’s hunger strike against cable work

एमएसबी कंपनी व एअरटेल कंपनीच्या केबल एकाच खोदाईत टाकून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. नियमानुसार रस्त्याच्या साईडपट्टीत केबल टाकणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी केबल गटारामधून टाकण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. Sarpanch’s hunger strike against cable work
खोदाईतील माती रस्त्याच्या कडेला टाकल्याने ती पावसामुळे डांबरी रस्त्यावर येऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने माती वाहून गेल्यामुळे केबल उघडी पडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे घाणेकर यांनी म्हटले आहे. Sarpanch’s hunger strike against cable work
सदर कामांची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, चौकशीची व्हिडीओ चित्रफीत तयार करण्यात यावी आणि चौकशीवेळी स्वतःला उपस्थित राहण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Sarpanch’s hunger strike against cable work
या निवेदनाच्या प्रती आमदार भास्कर जाधव, जिल्हाधिकारी रत्नागिरी, उपविभागीय अधिकारी चिपळूण, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, तहसीलदार गुहागर, पोलीस निरीक्षक गुहागर तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर यांना देण्यात आल्या आहेत. Sarpanch’s hunger strike against cable work
