• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नगरपंचायतीने तोडले 45 घरांचे पाणी

by Mayuresh Patnakar
May 23, 2021
in Old News
16 0
0
नगरपंचायतीने तोडले 45 घरांचे पाणी
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मँगो व्हिलेज : पाणी चोरीचा आरोप चुकीचा

गुहागर, ता. 23 : ऐन उन्हाळ्यात, कोरोनाच्या संकटात गुहागर नगरपंचायतीने मँगो व्हिलेज गृह संकुलातील 45 घरांचे पाणी तोडले आहे. हे गृह संकुल पाणी चोरत होते त्यांना अधिकृतरित्या 45 नळ जोडण्या देण्याची तयारी आहे. असे नगरपंचायतीचे म्हणणे आहे. तर कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था विनासूचना पाणी तोडू शकत नाही. नगरपंचायतीने सर्व पैसे भरुन आम्हाला नळ जोडणी दिली होती. त्यामुळे पाणी चोरीचा आरोपच चुकीचा आहे. असे मँगो व्हिलेज व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

पार्श्र्वभुमी

गुहागर शहरात मँगो व्हिलेज हा एक मोठा गृहप्रकल्प आहे. या गृहप्रकल्पातील 45 घरांसाठी तीन इंचाची नळ जोडणी गुहागर नगरपंचायतीने 2012 मध्ये दिली होती. ही जोडणी मुख्य जलवाहीनीवरुन देण्यात आली होती. त्यावेळी गुहागर नगरपंचायतीवर प्रशासक होता. 2018 मध्ये गुहागर नगरपंचायतीवर शहर विकास आघाडीची सत्ता आली. सत्ता स्थापनेनंतर शहर विकास आघाडीच्या पाणी कमिटीने मँगो व्हिलेजच्या तीन इंचाच्या नळ जोडणीवर आक्षेप घेतला. मँगो व्हिलेजला 26 ऑक्टोबर 2018 ला नोटीस पाठवली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पाणी पट्टी न भरता  परस्पर ही नळ जोडणी घेतल्याचा ठपका गुहागर नगरपंचायतीने ठेवला. तसेच 2013-14 ते 2018-2019 या कालावधीतील 45 घरांची 600 रु. प्रमाणे पाणी पट्टी भरण्याचे आदेश या नोटीसमधुन देण्यात आले.
मँगो व्हिलेज व्यवस्थापनाने तत्काळ 6 वर्षांची रु. 600 प्रमाणे 45 घरांची रु. 1 लाख 62 हजाराची पाणीपट्टी तत्काळ भरली. त्याचवेळी नगरपंचायतीच्या नोटीसीला उत्तर देताना म्हटले की, परस्पर पाणी जोडणी घेतल्याचा आरोप खोटा आहे. नळ जोडणी मंजूर केल्याचे नगरपंचायत प्रशासनाचे पत्र आहे. तसेच पाणी पट्टी भरण्यासंदर्भातील मागणीपत्रक देण्यासंदर्भात 2013-14 पासून आम्ही नगरपंचायतीकडे मागणी केली आहे. मात्र नगरपंचायतीने 5 वर्षात आम्हाला एकही पाणीपट्टीचे मागणीपत्रच दिलेले नाही.  या पत्रासोबत नळजोडणी मंजूर केल्याचे पत्र आणि पाणीपट्टीच्या मागणीची पत्र मँगो व्हिलेजने पुराव्यादाखल जोडली.
2012 मध्ये नळ जोडणीसाठी भरलेल्या पैशाची पावती मँगो व्हिलेजला सापडली नाही. सदर पावतीची दुय्यम प्रत देण्यास नगरपंचायतीनेही असमर्थतात दर्शवली. त्यामुळे 11 जुन 2019 मध्ये पुन्हा एकदा 45 नळ कनेक्शन मिळण्यासाठी प्रती जोडणी 1200 रु. प्रमाणे 54 हजार रुपये भरले. तरीही नगरपंचायतीने जुन 2019 पासून आजपर्यंत नळ जोडण्या दिलेल्या नाहीत. मात्र या नळ जोडण्यासाठी लागणारे साहित्य मँगो व्हिलेज व्यवस्थापनाने उपलब्ध करुन न दिल्याने नळ जोडण्या देण्याचे काम अपूर्ण आहे. अशी माहिती गुहागर नगरपंचायतीने दिली.

पाण्यावरुन शीतयुद्ध

मँगो व्हिलेजमधील कर्मचारी दिवसादेखील पाण्याचा व्हॉल्व सुरु ठेवून जास्त पाणी घेतात. त्यामुळे किर्तनवाडीला पाणीपुरवठा करणारी टाकी भरत नाही. परिणामी किर्तनवाडीला अपुरा पाणी पुरवठा होतो. अशी तक्रार ग्रामस्थांनी गुहागर नगरपंचायतीकडे केली होती.  त्यामुळे नगरपंचायतीने मँगो व्हिलेजच्या 3 इंचाच्या जलवाहिनीवर 1 इंच व्यासाचा जलवाहक (रिड्युसर) लावला. हा रिड्यूसर कोणताही पत्रव्यवहार न करता लावल्याने मँगो व्हिलेज व्यवस्थापनाने तो काढून टाकला. इथून नगरपंचायत आणि मँगो व्हिलेज या वादाला सुरवात झाली. त्याचवेळी नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांना पाण्याच्या व्हॉल्व्हची तपासणी करण्याकरीता मँगो व्हिलेजच्या क्षेत्रात येऊ दिले जात नाही. असे आरोप न.प.कडे कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे मँगो व्हिलेजच्या परिसरातील व्हॉल्व्ह बाहेर घेतला. त्याला लोखंडी चौकट बसविण्यात आली. त्या चौकटीवर कुलूप लावण्यात आले. मात्र हा व्हॉल्व्हदेखील अवेळी सुरु केला जात असल्याचे आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे. असे न.प. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अखेर या वादाची परिणीती 15 एप्रिल 2021ला मँगो व्हिलेज गृह संकुलाला दिलेले पाणी तोडण्यात झाली आहे.

पाणी तोडणे बेकायदेशीर

या संदर्भात मँगो व्हिलेजचे समीर काळे म्हणाले की, 2012 मध्ये नगरपंचायतीने दिलेली ३ इंचाची जोडणी कोणतेही लेखी पत्र न देता म्हणजेच अनधिकृतरित्या कमी करण्यात आली. पाणीपट्टी भरुन घ्या म्हणून आम्ही नगरपंचायतीच्या मागे लागलो होतो. 45 नळ कनेक्शनसाठी भरलेल्या पैशांची दुय्यम प्रत नगरपंचायत देवू शकत नाही. म्हणून पुन्हा पैसे भरले. तरी देखील आमच्याच आवारात आम्हीच बसवलेला व्हॉल्व्ह चालू बंद करण्याचा अधिकार आम्हाला नाही. हे अनाकलनीय आहे. शिवाय याचा चोरी म्हटली जाते या मुर्खपणा आहे. चोरी केली असे गृहित धरले तर त्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस नगरपंचायतीने, पाणी कमिटीने पाठवली का, कारवाई म्हणून पाणी तोडण्यापूर्वी तसे पत्र आम्हाला दिले का. या दोन्ही गोष्टी न करता थेट पाणी बंद करणे हे केवळ अन्यायकारक नसुन बेकायदेशीर आहे. कोणतीही नगर पालिका, नगर पंचायतीला एखाद्या नागरिकाचे पाणी तोडण्याचे अधिकारच नाहीत. त्यामुळे आम्ही या प्रश्र्नी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहोत.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.