• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नुकसानभरपाईचे पंचनामे सहानभुतीपूर्वक करा

by Ganesh Dhanawade
May 19, 2021
in Old News
17 0
0
नुकसानभरपाईचे पंचनामे सहानभुतीपूर्वक करा

गुहागर : आढावा बैठकीत बोलताना आमदार भास्कर जाधव

33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव; तौक्ते वादळातील नुकसानीचा घेतला आढावा

गुहागर, ता. 19 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार की निसर्ग वादळाप्रमाणे महाराष्ट्र शासन निकष लावणार हे अजुनही नक्की व्हायचे आहे. मात्र बाधित जनतेचा सहानभुतीपूर्वक विचार करुन आपण पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त त्यातून सुटता कामा नये. याची काळजी प्रशासनाने घ्याची. असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले. ते गुहागर पंचायत समितीच्या तौक्ते वादळ नुकसान आढावा बैठकीत बोलत होते. 
गुहागर तालुक्यात 134 घरे, 3 गोठे, जिल्हा परिषद शाळांचे 3 रंगमंच, 2 ग्रामपंचायत इमारत, 2 सार्वजनिक शौचालये, 2 स्मशानभूमी यांचे अंशत: नुकसान झाले आहे. एक कृषी पंप वाहून गेला आहे. 4 गुरे दगावली आहेत.  1 मच्छीमार बोट, 1 गांडुळखताचा प्रकल्प यांचेही नुकसान झाले आहे. 
तालुक्यातील 56 हेक्टर क्षेत्रात 225 शेतकऱ्यांच्या बागेत आंबा गळून पडला आहे. 8 हेक्टर क्षेत्रातील 45 शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याची झाडे उन्मळून पडलेली आहेत. 94 शेतकऱ्यांच्या 17 हेक्टर क्षेत्रातील काजू पिकाचे नुकसान झाले आहे. तर 30 शेतकऱ्याच्या नारळ, सुपारी बागांचे नुकसान झाले आहे. असे 84.5 हेक्टरमधील 394 शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने आजच्या बैठकीत दिला.  
तौक्ते वादळात महावितरणचे 150 उच्चदाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब आणि 350 लघुदाबाच्या वीज वाहिन्यांचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे 17400 ग्राहकांचा वीज पुरवठा आजही खंडीत आहे. पालशेत, आबलोली आणि गुहागर शाखा कार्यालय क्षेत्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अशी माहिती रानवीच्या शाखा अभियंत्यांनी दिली. 
यावेळी बोलताना आमदार जाधव म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली गेली तर अंशत: नुकसानीपोटी एका घराला 5 हजार रुपये मिळतात. पण निसर्ग वादळातील निकष महाराष्ट्र शासनाने लावले तर त्याच घराला 15 हजाराची नुकसानभरपाई मिळेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये बैल, म्हैस दगावले तर 35 हजारापर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतुद आहे. कृषी विभागाने पंचनामे करताना वादळात पिळवटून गेलेल्या झाडांचाही विचार करावा.  शासन कोणते निकष लावेल हे आज सांगू शकत नाही. मात्र नुकसानभरपाईचे पंचनामे कसे केले तर जनतेला अधिक भरपाई मिळेल हे आपण शोधुन काढले पाहिजे. त्यानुसार पंचनामे करावेत. जेणेकरुन बाधितांना योग्य मोबदला आपण देवू शकु. महावितरणचे पुन्हा एकदा अतोनात नुकसान झाले आहे. 450 वीजेचे खांब उभे करण्यासाठी पुन्हा एकदा वेगवेगळ्या ठिकाणाहून कंत्राटदारांच्या टीम बोलवाव्या लागतील. यासंदर्भात मी स्वत: कार्यकारी अभियंत्यांजवळ बोलतो. लवकरात लवकर तालुक्यातील जनतेला वीज मिळण्यासाठी आपण प्रयत्न करु या. 
या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष महेश नाटेकर, जि.प. सदस्य प्रविण ओक, सौ. नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती सौ. पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. 

Whether the compensation will be as per the National Disaster Management Act or whether the Maharashtra government will impose criteria like a natural storm is yet to be ascertained. But we should conduct panchnama with sympathetic consideration of the affected people. No one should be harmed. The administration should take care of this. This appeal was made by MLA Bhaskar Jadhav. He was speaking at a storm damage review meeting of Guhagar Panchayat Samiti.
In Guhagar taluka 134 houses, 3 cowsheds, 3 theaters of Zilla Parishad schools, 2 Gram Panchayat buildings, 2 public toilets, 2 cemeteries have been partially damaged. An agricultural pump has been carried. 4 cattle are slaughtered. 1 fishing boat, 1 vermicomposting project have also been damaged.
Mango has fallen in the orchards of 225 farmers in an area of ​​56 hectares in the taluka. The mango trees in the orchards of 45 farmers in an area of ​​8 hectares have been uprooted. The cashew crop in an area of ​​17 hectares of 94 farmers has been damaged. Coconut and betel nut orchards of 30 farmers have been damaged. The Department of Agriculture gave a preliminary report on the loss of 394 farmers in 84.5 hectares.
MSEDCL's 150 high voltage power lines and 350 low voltage power lines have been destroyed in the storm. As a result, power supply to 17,400 customers is still cut off. The worst affected areas are Palshet, Abloli and Guhagar branch offices. This information was given by Ranvi's branch engineers.  

Community-verified icon







Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.